शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

दुष्काळापाठोपाठ महागाईच्या झळांची तीव्रता वाढली

By admin | Updated: August 31, 2015 03:55 IST

दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या

बारामती : दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. तूरडाळ होलसेल बाजारात १६० रुपये किलोवर पोहोचल्याने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तूरडाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे. गरिबांच्या ताटातून वरण-आमटी गायब होऊ लागली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबात आहारामध्ये डाळींचा वापर केला जातो. भात-वरण, वरण-भाकरी गरिबांचे अन्न समजले जाते; मात्र या वरणाच्या सर्वच डाळींचे दर मागील काही महिन्यांपासून कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकाचे गणित बिघडू लागले आहे. वाढलेल्या दराचा परिणाम बाजारातही जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून डाळींच्या मागणीतही घट झाली आहे, तर आठवडेबाजारातून डाळींची मागणी करणारे ग्राहकच गायब असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. विक्रीसाठी आणलेली १० किलो तूरडाळीचीदेखील एका महिन्याच्या कालावधीत विक्री झाली नसल्याचे येथील व्यापारी बाळू खिंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सर्वसामान्य कुटुंबामध्ये रोजच्या जेवणात डाळीचे वरण, आमटी यांचा समावेश असतो. विशेषत: आजारी व्यक्ती व ज्येष्ठांच्या आहारात वरण अत्यावश्यक पदार्थ आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. त्यातच मानवी जीवनातील मूलभूत गरज असणारे अन्न महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आला आहे. डाळींपाठोपाठ जेवणाची लज्जत वाढवणारा कांदा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बाजारात सध्या मध्यम प्रतीचा कांदा प्रतिकिलो ६० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर केरळ येथील ‘सांबर कांदा’ १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. या कांद्याला हॉटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी आहे, असे येथील विक्रेत्यांनी सांगितले. (वार्ताहर)