शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळापाठोपाठ महागाईच्या झळांची तीव्रता वाढली

By admin | Updated: August 31, 2015 03:55 IST

दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या

बारामती : दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. तूरडाळ होलसेल बाजारात १६० रुपये किलोवर पोहोचल्याने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तूरडाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे. गरिबांच्या ताटातून वरण-आमटी गायब होऊ लागली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबात आहारामध्ये डाळींचा वापर केला जातो. भात-वरण, वरण-भाकरी गरिबांचे अन्न समजले जाते; मात्र या वरणाच्या सर्वच डाळींचे दर मागील काही महिन्यांपासून कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकाचे गणित बिघडू लागले आहे. वाढलेल्या दराचा परिणाम बाजारातही जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून डाळींच्या मागणीतही घट झाली आहे, तर आठवडेबाजारातून डाळींची मागणी करणारे ग्राहकच गायब असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. विक्रीसाठी आणलेली १० किलो तूरडाळीचीदेखील एका महिन्याच्या कालावधीत विक्री झाली नसल्याचे येथील व्यापारी बाळू खिंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सर्वसामान्य कुटुंबामध्ये रोजच्या जेवणात डाळीचे वरण, आमटी यांचा समावेश असतो. विशेषत: आजारी व्यक्ती व ज्येष्ठांच्या आहारात वरण अत्यावश्यक पदार्थ आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. त्यातच मानवी जीवनातील मूलभूत गरज असणारे अन्न महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आला आहे. डाळींपाठोपाठ जेवणाची लज्जत वाढवणारा कांदा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बाजारात सध्या मध्यम प्रतीचा कांदा प्रतिकिलो ६० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर केरळ येथील ‘सांबर कांदा’ १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. या कांद्याला हॉटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी आहे, असे येथील विक्रेत्यांनी सांगितले. (वार्ताहर)