शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवकाळीनंतर राज्यात आता सुटले थंड वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:34 IST

अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात थैमान घातल्यानंतर आता थंड वारे वाहू लागले आहे.

पुणे : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात थैमान घातल्यानंतर आता थंड वारे वाहू लागले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून काही भागांतील कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे. त्यामुळे लवकरच हुडहूडी भरणारी थंडी पडेल, असा अंदाज आहे.रविवारी राज्यात अहमदनगर येथे सर्वात कमी १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा १.३ अंशाने कमी होते. त्यापाठोपाठ महाबळेश्वर येथे सर्वात कमी १५.५ अंश तापमानाची नोंद झाली. मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, अकोला व पणजीमधील कमाल तापमान सरासरीच्या खाली आले होते. मुंबई व रत्नागिरीसह सातारा येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे.राज्याच्या अनेक भागात सकाळी दाट धुक्याची चादर पसरत आहे. त्याचा परिणाम, विमान उड्डाणांसह रस्ते वाहतुकीवरही होत आहे. संध्याकाळपासूनच हवेत काहीसा गारवा येत असून रात्री त्यात वाढ होत आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.