शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अखेर इंद्रायणीत सोडले पाणी

By admin | Updated: November 18, 2016 06:06 IST

अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारी, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पाटबंधारे विभागाकडून कोरड्या

आळंदी : अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारी, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पाटबंधारे विभागाकडून कोरड्या पडलेल्या इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे भाविकांची गैरसोय दूर झाली आहे.याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा करत पाण्याअभावी भाविकांच्या होत असलेल्या गैरसोयी मांडल्या होत्या. याची दखल घेत परिस्थिती ओळखून प्रशासनानेदेखील यंदा नेहमीपेक्षा आठवडाभर अगोदरच इंद्रायणीत पाणी सोडले आहे.या वर्षी जोरदार पाऊस झाला असला, तरी इंद्रायणी नदीपात्र कोरडे पडले होते. कार्तिकस्नानपर्व सुरू असल्याने तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा राबता होता. मात्र इंद्रायणी घाटावर नदीत स्नान करण्याजोगे पाणीच नसल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. घाटावर स्नान करून माऊलींचे दर्शन घेण्याचा भाविकांचा नित्यनेम पाण्याअभावी चुकत होता. ‘लोकमत’ने ३ नोव्हेंबरला ही समस्या मांडली होती. याची दखल घेत नगरपालिकेच्या वतीने तातडीने पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. याची दखल घेऊन प्रशासनाकडून इंद्रायणीत पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. दोन दिवसांपासून इंद्रायणीत पाणी सोडण्यात येत असून, कोरडी पडलेलली इंद्रायणी खळाळून वाहात आहे. मात्र, या पाण्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहून आली असून, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका भागातील दूषित पाणी मिसळल्याने पाण्याला काळसरपणा आलेला दिसून येतो. पण आता पाणी आल्याने भाविक आनंद व्यक्त करीत असताही, इंद्रायणीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याची खंत व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)