शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १८ वर्षांनंतर झाली बापलेकीची भेट, सोशल मीडियामुळे सापडणे झाले शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:36 IST

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळे सामाजिक धोके निर्माण होत असले तरी त्याचा योग्य वापर केल्यास काही चांगलेदेखील घडून येऊ शकते, याची प्रचिती या घटनेमुळे आली.

रावणगाव : फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळे सामाजिक धोके निर्माण होत असले तरी त्याचा योग्य वापर केल्यास काही चांगलेदेखील घडून येऊ शकते, याची प्रचिती या घटनेमुळे आली.तब्बल १८ वर्षांपूर्वी घरदार सोडून गेलेल्या गृहस्थास व्हॉट्सअ‍ॅपमुळे पुन्हा घरवापसी करणे शक्य झाले. यासाठी काही जागरूक तरुणांनी पुढाकार घेतला. बारामती तालुक्यातील सावळ गावातील संपत विठ्ठल आटोळे (वय ६०) हे गृहस्थ सन २००० साली आपल्याकडून झालेल्या थोड्याशा चुकीमुळे शेजारच्या शेतकऱ्याचा ऊस जळाल्याने त्यांच्यापासूनआपल्याला त्रास होईल, या भीतीने तसेच घरगुती वादविवादामुळे मानसिक संतुलन ढासळल्याने ते घराबाहेर पडले.घर सोडल्यानंतर मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल ते काम करत वेगवेगळ्या गावांमध्ये संपत आटोळे हे फिरत राहिले. त्याच दरम्यान जाधव आणि बिरादार यांनी (सावळ, ता. बारामती) येथील भारतीय जनता पार्टीचे बारामती तालुका अध्यक्ष प्रवीण आटोळे यांच्याशी संपर्क केला. तुमच्या गावातून संपत आटोळे नावाचा कोण माणूस घरातून निघून गेला आहे का, याची चौकशी त्यांना करावयास त्यांना सांगितले. दरम्यान प्रवीण आटोळे यांनी प्रथमदर्शनी चौकशी केल्यावर त्यांच्या काहीच लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर त्या व्यक्तीचा फोटो पाठविण्यास सांगितले आणि मग जाधव आणि बिरादार यांनी संपत यांचा फोटो प्रवीण आटोळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविल्यानंतर तो फोटो गावातील काही वृद्ध लोकांना दाखविला असता हे तर आपल्याच गावातील संपत विठ्ठल आटोळे आहेत.लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील जानापूर या गावात गेले. त्याच गावात (भिगवण, ता. इंदापूर) येथील जेसीबी व्यावसायिक मोहन जाधव हे आपल्या कामानिमित्त जानापूरात गेले असता तेथील मित्राला भेटावयास गेले होते. तेव्हा त्यांना मित्राच्या घराशेजारीच एक गृहस्थ अत्यंत केविलवाण्या अवस्थेत बसलेले दिसले. त्यांचा चेहरा आणि पोशाख पाहून जाधव यांना त्यांची दया आल्याने त्यांनी या गृहस्थाची विचारपूस केली असता ते फक्त संपत आटोळे एवढेच नाव सांगून गप्प बसले. त्यानंतर जाधव आणि त्यांचे जानापूरचे मित्र कल्याण बिरादार यांनी आटोळे आडनावाचे लोक कोठे कोठे राहतात. याचा शोध घेणे सुरू केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांना संपर्क केला.त्यानंतर त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईकांनी दोन-तीन वर्षे शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते न सापडल्याने घरातीलमंडळींनी त्यांची घरी पुन्हा माघारी येण्याची आशा सोडूनच दिली होती.मग शिवाजी आटोळे यांनी संपत आटोळे यांच्या (रावणगाव ता. दौंड) येथील जावयाचे मोठे बंधू अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. अशोक गावडे आणि शिवाजी आटोळे हे जानपूर या गावी संपत यांना आणावयास गेले. त्यांनी आपला पुतण्या शिवाजी आटोळे यांना पाहताच संपत यांनी त्यांना मिठी मारली.आणि जोरजोरात रडू लागले. त्यानंतर संपत आटोळे रावणगाव येथील त्यांच्या मुलीकडे आणले असता आपल्या वडिलांना पाहताच मुलीचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण एका मुलीला आपले घरातून निघून गेलेले वडील तब्बल १८ वर्षांनी आपल्याला भेटताहेत यावर काही क्षण तिचा विश्वासच बसत नव्हता.