शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सहा वर्षांपासून दिव्यांग महामंडळाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

पुणे : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा. तसेच दिव्यांगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ...

पुणे : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा. तसेच दिव्यांगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे. या उद्देशाने शासनाने २७ मार्च २००२ रोजी दिव्यांग महामंडळाची स्थापना केली. मात्र, मागील सहा वर्षांपासून महामंडळाला निधी मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.

अपंग वित्त महामंडळाकडून राज्यातील एकाही दिव्यांगांना सहा वर्षांत व्यवसायासाठी कर्ज मंजुरी मिळालेली नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दिव्यांगांना व्यवसायांसाठी कर्ज मिळावे यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी मागणी केली.

दिव्यांगांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे अपंग वित्त व विकास महामंडळ केंद्र सरकारचा सर्वोत्तम राज्य पुरस्कृत यंत्रणेचा राष्ट्रीय पुरस्कार घेऊन केंद्र शासनाच्या वतीने २०१६ साली गौरव केला आहे. मात्र, असे असतानाही महामंडळाला निधीची कमतरता भासत आहे.

---

जिल्हा कार्यालयात अर्जदेखील उपलब्ध नाही

महामंडळाला अधिकृतरित्या गेले पाच वर्षांपासून कार्यकारी संचालक म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक नाही. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने, मोबाईल शॉप, आंँन व्हेईकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा १० जून २०१९ शासन निर्णय आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील एकाही दिव्यांगाचे व्यवसायासाठी फिरत्या वाहनावरील दुकानात अर्थसहाय्य दिलेले नाही. दिव्यांगांना व्यवसायासाठी ५० हजार रुपये अल्प व्याजदराने कर्ज देण्यासंदर्भात शासन निर्णय केला आहे. मात्र सदर योजनेचा अर्ज देखील जिल्हा कार्यालयात उपलब्ध नाही.

-----

मागणी केलेले कर्ज प्रकरण मंजूर होईना

कोरोनामुळे दिव्यांग बांधव आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारी व खाजगी नोकरी नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्याची आवश्यकता आहे. परंतु, दिव्यांग महामंडळाकडे पैसाच उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांगांसाठी व्यवसायासाठी मागणी केलेले अर्ज प्रकरण मंजूर होत नाहीत. त्यामुळे सरकारने दिव्यांग वित्त विकास महामंडळावर आर्थिक तरतूद करून साहाय्य करून महाराष्ट्रातील दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेने केली आहे.