शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सहा वर्षांपासून दिव्यांग महामंडळाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

पुणे : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा. तसेच दिव्यांगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ...

पुणे : दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध व्हावा. तसेच दिव्यांगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे. या उद्देशाने शासनाने २७ मार्च २००२ रोजी दिव्यांग महामंडळाची स्थापना केली. मात्र, मागील सहा वर्षांपासून महामंडळाला निधी मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.

अपंग वित्त महामंडळाकडून राज्यातील एकाही दिव्यांगांना सहा वर्षांत व्यवसायासाठी कर्ज मंजुरी मिळालेली नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दिव्यांगांना व्यवसायांसाठी कर्ज मिळावे यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी मागणी केली.

दिव्यांगांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे अपंग वित्त व विकास महामंडळ केंद्र सरकारचा सर्वोत्तम राज्य पुरस्कृत यंत्रणेचा राष्ट्रीय पुरस्कार घेऊन केंद्र शासनाच्या वतीने २०१६ साली गौरव केला आहे. मात्र, असे असतानाही महामंडळाला निधीची कमतरता भासत आहे.

---

जिल्हा कार्यालयात अर्जदेखील उपलब्ध नाही

महामंडळाला अधिकृतरित्या गेले पाच वर्षांपासून कार्यकारी संचालक म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक नाही. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने, मोबाईल शॉप, आंँन व्हेईकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा १० जून २०१९ शासन निर्णय आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील एकाही दिव्यांगाचे व्यवसायासाठी फिरत्या वाहनावरील दुकानात अर्थसहाय्य दिलेले नाही. दिव्यांगांना व्यवसायासाठी ५० हजार रुपये अल्प व्याजदराने कर्ज देण्यासंदर्भात शासन निर्णय केला आहे. मात्र सदर योजनेचा अर्ज देखील जिल्हा कार्यालयात उपलब्ध नाही.

-----

मागणी केलेले कर्ज प्रकरण मंजूर होईना

कोरोनामुळे दिव्यांग बांधव आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारी व खाजगी नोकरी नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्याची आवश्यकता आहे. परंतु, दिव्यांग महामंडळाकडे पैसाच उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांगांसाठी व्यवसायासाठी मागणी केलेले अर्ज प्रकरण मंजूर होत नाहीत. त्यामुळे सरकारने दिव्यांग वित्त विकास महामंडळावर आर्थिक तरतूद करून साहाय्य करून महाराष्ट्रातील दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेने केली आहे.