शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बाधित नागरिकांना आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:22 IST

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागील काही महिन्यात आयुक्तांबरोबर याबाबतीत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी मागील अनेक वर्षे भिजत ...

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागील काही महिन्यात आयुक्तांबरोबर याबाबतीत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी मागील अनेक वर्षे भिजत पडलेल्या या प्रकल्पास क्षेत्रीय कार्यालय स्तरावर गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरील भागात सोसायट्या व लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे अपुरा पडणारा डीपी रस्ता व विकास करण्यास हरकत नव्हतीच.

फक्त सोशल मीडियावर भाजपसह सर्वच पक्षच्या नेते मंडळींनी जे प्रदर्शन मांडले त्यामुळेच येथील बाधित नागरिकांच्या दुःखात भर पडली आहे. घर म्हटलेकी की नागरिकांच्या विशेषतः कुटुंबातील महिला वर्गाच्या भावनेचा व जिव्हाळ्याचा विषय असतो. येथील कारवाई सुरू असताना अडचण होईल किंवा म्हणून कोणीही नगरसेवक किंवा इतर पक्षाचे नेते मंडळींनी येथे येण्याची तसदी घेतली नाही. फक्त याच कॉलनीत राहणारा मनसेचा नितीन गायकवाड हाच काय तो प्रशासन व बाधित नागरिकांच्या मध्ये दुवा ठरत होता. इतर मंडळी तर आपल्यामुळेच रस्ता मार्गी लागतोय याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात मशगुल होते. त्यामुळे मोठ्या वर्गाला रस्त्याचा फायदा होत असला तरी अनेकांची कष्टाने कमाविलेले घर व त्यांचा जीव दोन्ही तुटत होते.

या कारवाईतही राजकारण झाले आहे. काही ठिकाणी चेहरे पाहून कारवाई झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली आहे. तर यशस्वी कारवाई करून सुटकेचा निःश्वास टाकणारे उपायुक्त नितीन उदास, सहायक आयुक्त संदीप कदम, व अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप हे खमके अधिकारी देखील यावेळी अभिनंदनास पात्र आहेत.

चौकट:- रस्त्याच्या समोर येऊन दुकाने काढण्याची आस

आता ज्यांचे घर वाचले आहे व ते रस्त्याच्या कडेला आले आहेत ते सर्व येथे दुकाने किंवा व्यवसायिक वास्तू उभारण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच येथे शह कटशह करून कसेतरी रस्त्याच्या कडेला येण्याचा आटापिटा रंगला आहे. त्यामुळेच लोक एकमेकांच्या प्रकरणात देखील डोकं खुपसून राजकारण करताना दिसत आहेत. त्यामुळे आता तरी हे सर्व थांबवा नाही तर सागर कॉलनी च्या बाजूला सीमा भिंत घालून सर्वांचेच मनसुबे उधळून लावू असा इशारा येथे अधिकाऱ्यांनी दिला आहे

फोटो सागर:- कॉलनीत केलेली कारवाई