शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बाधित नागरिकांना आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:22 IST

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागील काही महिन्यात आयुक्तांबरोबर याबाबतीत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी मागील अनेक वर्षे भिजत ...

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागील काही महिन्यात आयुक्तांबरोबर याबाबतीत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी मागील अनेक वर्षे भिजत पडलेल्या या प्रकल्पास क्षेत्रीय कार्यालय स्तरावर गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरील भागात सोसायट्या व लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे अपुरा पडणारा डीपी रस्ता व विकास करण्यास हरकत नव्हतीच.

फक्त सोशल मीडियावर भाजपसह सर्वच पक्षच्या नेते मंडळींनी जे प्रदर्शन मांडले त्यामुळेच येथील बाधित नागरिकांच्या दुःखात भर पडली आहे. घर म्हटलेकी की नागरिकांच्या विशेषतः कुटुंबातील महिला वर्गाच्या भावनेचा व जिव्हाळ्याचा विषय असतो. येथील कारवाई सुरू असताना अडचण होईल किंवा म्हणून कोणीही नगरसेवक किंवा इतर पक्षाचे नेते मंडळींनी येथे येण्याची तसदी घेतली नाही. फक्त याच कॉलनीत राहणारा मनसेचा नितीन गायकवाड हाच काय तो प्रशासन व बाधित नागरिकांच्या मध्ये दुवा ठरत होता. इतर मंडळी तर आपल्यामुळेच रस्ता मार्गी लागतोय याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात मशगुल होते. त्यामुळे मोठ्या वर्गाला रस्त्याचा फायदा होत असला तरी अनेकांची कष्टाने कमाविलेले घर व त्यांचा जीव दोन्ही तुटत होते.

या कारवाईतही राजकारण झाले आहे. काही ठिकाणी चेहरे पाहून कारवाई झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली आहे. तर यशस्वी कारवाई करून सुटकेचा निःश्वास टाकणारे उपायुक्त नितीन उदास, सहायक आयुक्त संदीप कदम, व अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप हे खमके अधिकारी देखील यावेळी अभिनंदनास पात्र आहेत.

चौकट:- रस्त्याच्या समोर येऊन दुकाने काढण्याची आस

आता ज्यांचे घर वाचले आहे व ते रस्त्याच्या कडेला आले आहेत ते सर्व येथे दुकाने किंवा व्यवसायिक वास्तू उभारण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच येथे शह कटशह करून कसेतरी रस्त्याच्या कडेला येण्याचा आटापिटा रंगला आहे. त्यामुळेच लोक एकमेकांच्या प्रकरणात देखील डोकं खुपसून राजकारण करताना दिसत आहेत. त्यामुळे आता तरी हे सर्व थांबवा नाही तर सागर कॉलनी च्या बाजूला सीमा भिंत घालून सर्वांचेच मनसुबे उधळून लावू असा इशारा येथे अधिकाऱ्यांनी दिला आहे

फोटो सागर:- कॉलनीत केलेली कारवाई