शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

थंडीमुळे रब्बी पिकांना होतोय फायदा

By admin | Updated: January 7, 2015 22:59 IST

जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांना पोषक ठरत असून, थंडीमुळे रब्बीतील पिकांचे उत्पादन वाढणार आहे.

ओझर : जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांना पोषक ठरत असून, थंडीमुळे रब्बीतील पिकांचे उत्पादन वाढणार आहे. या हंगामातील गहू, हरभरे या पिकांना थंडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून, थंडीमुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत आहे. या पिकांना थंडी आवश्यक असते. तालुक्यात पाच हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर कांदा पीक घेण्यात आले असून, तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर गहू तर १७०० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. शेतकरी नगदी पीक म्हणून या पिकाचे उत्पादन घेत आहे. कांदा पिकाचे उत्पादन चांगल्या पद्धतीने निघाल्यास व बाजारभावाची साथ मिळाल्यामुळे लागवडीची उड्डाणे शेतकरी घेत आहे. गतवर्षी कांद्याचे उत्पादन चांगले निघाले होते. परंतु योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे बराकीतच सडले होते. थोड्याफार लोकांना कांद्याचे पैसे हातात आले. एक एकर कांद्यासाठी सुमारे ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च येतो. एवढे भांडवल घातल्यानंतर १० ते १५ टन उत्पादन हातात येते. एप्रिल महिना कांदा काढणीनंतर बहुतांश शेतकरी कांदा साठवणगृहात साठवून ठेवतात. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर चांगले राहतात. त्यामुळे शेतकरी कांदा या महिन्यापर्यंंत साठवून ठेवतात. सहा महिने कांदा साठवणगृहात राहिल्यानंतर वजन घट व सड होत असल्यामुळे आठ ते दहा टन उत्पादन शेवटी हातात येते. चांगले बाजारभाव मिळाले, तर शेतकऱ्याला कांदा पीक तारते. थंडीमुळे सध्या कांदा पीक जोमात असून, थंडीचे सातत्य राहिल्यास कांदा पिकाचे चांगले उत्पादन हातात येण्याच्या अपेक्षेने शेतकरी कांद्याला भांडवली खर्च करीत आहे. बाजारभावाचे गणित शेतकऱ्याच्या हातात नसल्यामुळे चांगले उत्पादन निघाले तरी उत्पन्नाची शाश्वती नसल्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस जुगारीचा होत चालला आहे. शेतकरीवर्ग शेती पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे. शेतमालाला हमी बाजारभाव नसल्यामुळे शेतीचे सततच आत बट्ट्याचे अर्थ कारण शेतकरीवर्गाला सोसावे लागत आहे. (वार्ताहर)४योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे बराकीतच सडले होते. थोड्याफार लोकांना कांद्याचे पैसे हातात आले. एक एकर कांद्यासाठी सुमारे ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च येतो. एवढे भांडवल घातल्यानंतर १० ते १५ टन उत्पादन हातात येते.