शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कार्यक्रमाच्या गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST

---- अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाच ते सहा मंगल कार्यालये आहेत. साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी ...

----

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाच ते सहा मंगल कार्यालये आहेत. साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी हजारोंच्या संख्येने हजेरी लावत असतात. त्याचप्रमाणे दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. याकडे पोलीस व प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

अवसरी खुर्द येथे १५ ते २० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुका तहसीलदार व पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी फाटा, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर फाटा, पारगाव या गावामध्ये अंदाजे ७ ते ८ लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लग्न समारंभासाठी फक्त २०० वऱ्हाडी मंडळींनाच परवानगी दिली असताना वरील कार्यालयात साखरपुडा व लग्न समारंभासाठी वऱ्हाडी मंडळी हजारोंच्या संख्येने हजेरी लावत असतात.

लग्न कार्यासाठी स्थानिक, पुणे, मुंबई व जिल्ह्यातून वऱ्हाडी मंडळी येत असतात. मंगल कार्यालयाचे मालक प्रशासनाचे कोणतेच नियम पाळत नसून मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. तोंडाला मास्क न लावता वऱ्हाडी मंडळी सर्रास फिरताना पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे लग्न कार्यानंतर डीजेच्या तालावर रात्रभर वरती चालू असतात. मंचर पोलीस स्टेशनला कळवूनदेखील कोणतीच कार्यवाही होत नाही. त्याचप्रमाणे दशक्रिया विधी व अंत्यविधीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

---

आंबेगावच्या पूर्व भागात रुग्ण वाढले

तालुक्याच्या पूर्व भागात अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, मेंगडेवाडी, कठापूर, मंचर आदी गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे आणि मंचर पोलीस ठाणे व आंबेगाव तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना नियमांची काटेकोर अंमलबाजवणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असल्याने मंगल कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी घेवून मंगल कार्यालयात शुभविवाह करण्यासाठी परवानगी द्यावी व यावर ग्रामपंचायत कार्यालयाचे लक्ष ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी द्यावेत व तसेच रात्रभर डीजेच्या तालावर चालणाऱ्या वरातींवर बंदी आणावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.