शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रशासन ‘बळी’ची वाट पाहते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 02:08 IST

खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची भावना : पावसामुळे शहरातील रस्त्यांची झाली चाळण

पुणे : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परंतु, हे प्रचंड पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासन ‘बळी’ जाण्याची वाट पाहते का, असा सवाल खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या पुणेकरांकडून विचारला जात आहे.

शहरामध्ये झालेल्या पहिल्याच पावसानंतर बहुतेक सर्व रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले होते. याबाबत प्रशासनावर जोरदार टीका झाल्यानंतर घाई-घाईने काही प्रमाणात शहरातील खड्डे बुजविण्यात आले. परंतु, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा पावसाने जोर धरला.गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे महापालिकेने घाई-घाईने बुजवलेले खड्ड्यांमधील डबर पावसाने निघून गेले असून, पुन्हा एकदा रस्त्यांची प्रचंड चाळण झाली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर ड्रेनेजची झाकणे तुटल्याने धोकादायक झालेत, सिमेंट रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरवरच खड्डे पडलेत, भुयारी मार्ग, सर्व्हिस रस्ते, पेठामधील लहान रस्ते सर्वच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे सध्या शहरात सर्वत्र खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देते ना प्रशासन. शहरातील खड्डे वेळीच बुजवले नाहीत, तर अपघात होऊन काही बळी जाण्याची शक्यात नाकारता येत नाही.

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा