शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

टमरेलबहाद्दरांवर कारवाई, २०० कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:31 IST

नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली

चाकण : शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १०० लोकांवर कारवाई करण्यात आली असून १२ लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे गेल्या १५ दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे.चाकण शहरातील बहुतेक नागरिकांकडे घरे आहेत, मात्र स्वच्छतागृहे नाहीत, अशा उघड्यावर शौचास जाणा-या २०० कुटुंबांना स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यातील ४३ कुटुंबांची स्वच्छतागृहे बांधून झाली आहेत. उर्वरित १२३ कुटुंबांचे स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व उघड्यावर शौचास जाणा-या व्यक्तीकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हीच व्यक्ती दुस-यांदा सापडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच तिस-या वेळी सापडल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नगर परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती धीरज मुटके, गटनेते किशोर शेवकरी, विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, तसेच सर्व नगरसेवक व नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सार्वजनिक स्थळे, मंदिरे, शाळा, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी ही मोहीम हाती घेतली आहे.>भाडेकरूंना सुविधा द्याचाकण शहरात अनेक भाडेकरू खोल्या आहेत. अशा ठिकाणी घरमालकांनी भाडेकरूंना स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने हे भाडेकरू उघड्यावर शौचास जात आहेत. शहरातील कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने बाहेरगावांमधून बाजार समितीत किंवा भाजीपाला बाजारात माल खरेदी-विक्री करणा-या लोकांना नाईलाजास्तव उघड्यावर जावे लागत आहे. मग नागरिक दंडात्मक कारवाईच्या कात्रीत सापडत आहेत.नगर परिषदेकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालय किंवा मुतारीची सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोयी-सुविधा उपलब्ध करून न देताच फक्त कारवाईचा दणका देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.१२ जणांना दंडचाकण परिसरात गेल्या १५ दिवसांपासून नगरपरिषदेतर्फे कारवाई करण्यात येत आहेत. आतापर्यंत १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. यातील कारवाईत दुसºयांना सापडलेल्या १२ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. प्रत्येकी ५०० असा ६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार आहेत. नागरिकांनी स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.