शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

टमरेलबहाद्दरांवर कारवाई, २०० कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:31 IST

नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली

चाकण : शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १०० लोकांवर कारवाई करण्यात आली असून १२ लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे गेल्या १५ दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे.चाकण शहरातील बहुतेक नागरिकांकडे घरे आहेत, मात्र स्वच्छतागृहे नाहीत, अशा उघड्यावर शौचास जाणा-या २०० कुटुंबांना स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यातील ४३ कुटुंबांची स्वच्छतागृहे बांधून झाली आहेत. उर्वरित १२३ कुटुंबांचे स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व उघड्यावर शौचास जाणा-या व्यक्तीकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हीच व्यक्ती दुस-यांदा सापडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच तिस-या वेळी सापडल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नगर परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती धीरज मुटके, गटनेते किशोर शेवकरी, विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, तसेच सर्व नगरसेवक व नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सार्वजनिक स्थळे, मंदिरे, शाळा, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी ही मोहीम हाती घेतली आहे.>भाडेकरूंना सुविधा द्याचाकण शहरात अनेक भाडेकरू खोल्या आहेत. अशा ठिकाणी घरमालकांनी भाडेकरूंना स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने हे भाडेकरू उघड्यावर शौचास जात आहेत. शहरातील कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने बाहेरगावांमधून बाजार समितीत किंवा भाजीपाला बाजारात माल खरेदी-विक्री करणा-या लोकांना नाईलाजास्तव उघड्यावर जावे लागत आहे. मग नागरिक दंडात्मक कारवाईच्या कात्रीत सापडत आहेत.नगर परिषदेकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालय किंवा मुतारीची सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोयी-सुविधा उपलब्ध करून न देताच फक्त कारवाईचा दणका देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.१२ जणांना दंडचाकण परिसरात गेल्या १५ दिवसांपासून नगरपरिषदेतर्फे कारवाई करण्यात येत आहेत. आतापर्यंत १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. यातील कारवाईत दुसºयांना सापडलेल्या १२ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. प्रत्येकी ५०० असा ६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार आहेत. नागरिकांनी स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.