शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

टमरेलबहाद्दरांवर कारवाई, २०० कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:31 IST

नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली

चाकण : शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १०० लोकांवर कारवाई करण्यात आली असून १२ लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे गेल्या १५ दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे.चाकण शहरातील बहुतेक नागरिकांकडे घरे आहेत, मात्र स्वच्छतागृहे नाहीत, अशा उघड्यावर शौचास जाणा-या २०० कुटुंबांना स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यातील ४३ कुटुंबांची स्वच्छतागृहे बांधून झाली आहेत. उर्वरित १२३ कुटुंबांचे स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व उघड्यावर शौचास जाणा-या व्यक्तीकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हीच व्यक्ती दुस-यांदा सापडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच तिस-या वेळी सापडल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नगर परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती धीरज मुटके, गटनेते किशोर शेवकरी, विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, तसेच सर्व नगरसेवक व नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सार्वजनिक स्थळे, मंदिरे, शाळा, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी ही मोहीम हाती घेतली आहे.>भाडेकरूंना सुविधा द्याचाकण शहरात अनेक भाडेकरू खोल्या आहेत. अशा ठिकाणी घरमालकांनी भाडेकरूंना स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने हे भाडेकरू उघड्यावर शौचास जात आहेत. शहरातील कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने बाहेरगावांमधून बाजार समितीत किंवा भाजीपाला बाजारात माल खरेदी-विक्री करणा-या लोकांना नाईलाजास्तव उघड्यावर जावे लागत आहे. मग नागरिक दंडात्मक कारवाईच्या कात्रीत सापडत आहेत.नगर परिषदेकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालय किंवा मुतारीची सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोयी-सुविधा उपलब्ध करून न देताच फक्त कारवाईचा दणका देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.१२ जणांना दंडचाकण परिसरात गेल्या १५ दिवसांपासून नगरपरिषदेतर्फे कारवाई करण्यात येत आहेत. आतापर्यंत १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. यातील कारवाईत दुसºयांना सापडलेल्या १२ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. प्रत्येकी ५०० असा ६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार आहेत. नागरिकांनी स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.