शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

आत्मीयतेबरोबरच कृती हवी : आमटे

By admin | Updated: June 23, 2016 02:28 IST

कोणत्याही आपत्तीग्रस्तांबाबत सहवेदना असणे महत्त्वाचेच आहे; मात्र ती कृतीत उतरली तरच जास्त प्रभावी व उपयोगी ठरते, असे प्रतिपादन डॉ. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी केले.

पुणे : कोणत्याही आपत्तीग्रस्तांबाबत सहवेदना असणे महत्त्वाचेच आहे; मात्र ती कृतीत उतरली तरच जास्त प्रभावी व उपयोगी ठरते, असे प्रतिपादन डॉ. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी केले. बाबांच्या आनंदवन संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा म्हणून प्रशिक्षण देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन येथे कौस्तुभ यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना १० टन धान्य पाठविण्यात आले. उपमहापौर मुकारी अलगुडे, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार सुभाष झांबड, आमदार दीप्ती चवधरी, माजी आमदार उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते.बागवे यांनी आपत्तीच्या काळात धावून जाणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. पंतप्रधान जगभर फिरतात; मात्र महाराष्ट्रातील दुष्काळाकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याची टीका त्यांनी केली. विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आनंदवन उपक्रम पाहून यावा व त्यात सहयोग द्यावा, असे आवाहन केले. उल्हास पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व आनंदवन यांचा संबंध उलगडून दाखविला. पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अभय छाजेड, सुधीर ज्यानजोत, माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. अजित दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)