शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जाहिरातीशिवाय पदभरती केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:01 IST

राज्यातील अनेक सार्वजनिक विद्यापीठांमध्ये स्वायत्ततेचा गैरवापर करून पदभरतीमध्ये अनियमितता केल्या जात असल्याचे आढळून आले आहे.

पुणे : राज्यातील अनेक सार्वजनिक विद्यापीठांमध्ये स्वायत्ततेचा गैरवापर करून पदभरतीमध्ये अनियमितता केल्या जात असल्याचे आढळून आले आहे. यापार्श्वभूमीवर जाहिरात न देता पद भरणे, शैक्षणिक अर्हता, पात्रता, अनुभव, वयाची अट न पाळणे आदी अनियमितता आढळून आल्यास संबंधित विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव यांना जबाबदार धरले जाईल, असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पदभरती प्रक्रिया निश्चित केली आहे, मात्र अनेक विद्यापीठांमध्ये तिचे पालन होत नसल्याच्या तक्रारी होत्या. यापार्श्वभूमीवर परिपत्रक अवर सचिव विजय साबळे यांनी काढले आहे. विद्यापीठांकडून पदभरती प्रक्रिया राबविताना अनेकदा जाहिरात दिली जात नाही. पात्रता, अनुभव, वयाची अट यांचे निकष पूर्ण न करता नियुक्ती केली जाते. अशा प्रकारे नियुक्त झालेले कर्मचारी बराच काळ शासनमान्य पदावर कार्यरत असतात. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला जातो. परंतु अशा प्रकारच्या अनियमिततेतून सवलत देता येत नाही, मात्र हे कर्मचारी सेवा नियमित करून वेतनविषयक तथा सेवानिवृत्तीचे लाभ मिळावे, यासाठी न्यायालयात धाव घेतात. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अशा अपात्र कर्मचा-यांच्या सेवा नियमित करून त्यांना सेवाविषयक लाभ देण्याची वेळ शासनावर येते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांकडून भरती प्रक्रिया अधिक योग्यप्रकारे पार पाडली जावी असे निर्देश देण्यात आले आहे. विद्यापीठांमध्ये हंगामी अथवा कंत्राटी स्वरूपात भरती करताना सामान्य प्रशासन विभागाने २५ आॅगस्ट २००५ च्या परिपत्रकातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे अनुभव, वयाची अट, शैक्षणिक अर्हता या बाबी विचारात घेऊन, त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. विद्यापीठांमध्ये भरती केलेल्या कर्मचाºयांच्या बाबतीत यापुढे कोणतीही अनियमितता आढळून आल्यास त्याला संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांना जबाबदार धरले जाईल, असे परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.>विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त्यानवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये हंगामी काळासाठी जाहिरात न देता नियुक्ती करण्याचे काही अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अनेक विद्यापीठांकडून या अधिकाराचा गैरवापर करून विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी), सुरक्षा संचालक वगैरे नियुक्त्या जाहिरात न देता केल्या जात आहेत. राज्य शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये मात्र विद्यापीठांनी जाहिरात न देता पदभरती करण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे