शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

तांदूळ फसवणूक करणारे आरोपी पाच महिने उलटूनही मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेड शिवापूर : शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या तांदळाच्या ३३० कट्ट्यांची सुमारे ८ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड शिवापूर : शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या तांदळाच्या ३३० कट्ट्यांची सुमारे ८ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पाच महिने उलटूनही आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना भेट देत या प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.

प्रकरणी तपास समाधानकारक नाही. गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी आरोपी सापडला नसून, राजगड पोलिसांचा तपास समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर या शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना अर्ज करून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.

शिवगंगा खोऱ्यातील अनेक गावांत इंद्रायणी तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट तांदळाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून असते. या भागातील वेगवेगळ्या गावांतील आठ शेतकऱ्यांकडून नवनाथ गिरी याने तांदळाचे सुमारे ३५० कट्टे दुसऱ्याच्या नावे खरेदी करून फसवणूक केली. त्या तांदळाची किंमत सुमारे आठ लाख रुपये होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच महिन्यांपूर्वी राजगड पोलिसात याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु पाच महिन्यांत या फसवणूक केलेल्या आरोपीला राजगड पोलिसांना पकडता आलेले नाही. तांदूळ पिकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर शेतकरी अवलंबून असतात. मात्र ही फसवणूक झाल्याने सध्या या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांच्या तपासात काहीच प्रगती नसल्याने अखेर या शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनाच अर्ज केला आहे. याप्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.

"गेल्या पाच महिन्यांत अजून आरोपीला पकडण्यात आलेले नाही. सध्या तर आमचे कोणी ऐकूनही घेत नाहीत. आरोपीला पकडून काय होणार आहे. आमच्यामागे एवढे एकच काम आहे का? तुम्ही तांदूळ देताना तुम्हाला समजले नाही का? अशी उडवाउडवीची उत्तरे आम्हाला तपास अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत," अशी प्रतिक्रिया या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

चौकट

तपास अधिकाऱ्याशी बोलून योग्य ती माहिती घेतेली जाईल, तपासकामात नेमकी काय अडचण आहे हे पाहून जर तपास अधिकारी बदलण्याची गरज असेल तर तो बदलण्यात येईल.

संदीप घोरपडे

पोलीस निरीक्षक राजगड पोलीस स्टेशन नसरापूर