शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

आरोपींना ‘लॉक अप’ वाटते घरासारखे

By admin | Updated: July 4, 2014 06:46 IST

गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलीस असतात. मात्र, गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांकडून राखली जाणारी बडदास्त, दोघांमधील जवळीक यामुळे आरोपीलाही ‘लॉकअप’ मध्ये असताना घरात असल्यासारखेच वाटते.

मंगेश पांडे, पिंपरीगुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलीस असतात. मात्र, गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांकडून राखली जाणारी बडदास्त, दोघांमधील जवळीक यामुळे आरोपीलाही ‘लॉकअप’ मध्ये असताना घरात असल्यासारखेच वाटते. पोलिसांनी खाकीशी प्रामाणिक राहून आरोपीला आरोपीसारखी वागणूक दिल्यास गुन्ह्यांचा आलेख कमी होण्यास मदत होईल. कायदा सर्वांना समान असल्याची शिकवण दिली जाते. कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी असो, त्याला आरोपीप्रमाणे वागणूक देणे आवश्यक आहे. पुन्हा गुन्हा करण्याचे आरोपीने धाडस करू नये, यासाठी पोलिसांकडून त्याला कडक शासन होणेही गरजेचे असते. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी फिर्यादीची अपेक्षा असते. आर्थिक हितसंबंधातून पोलीस आरोपीला गुन्हेगाराची वागणूक देण्याऐवजी त्याची बडदास्त राखतात. आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी बऱ्याचदा त्याला बेड्या ठोकण्याचे धाडसही पोलीस दाखवित नाहीत, त्यामुळे न्यायालयात हजर करताना अथवा इतर वेळी पोलीस आणि आरोपी मित्राप्रमाणेच फिरताना आणि गप्पा मारतानाचे चित्र पहायला मिळते. कायदा सर्वांना समान आहे. अशामुळे खाकीची ताकद कमी होत असल्याने सामान्य नागरिकांनाही आपण असुरक्षित असल्याचे वाटते. गुन्ह्यातील आरोपीला अटक करून ‘लॉकअप’मध्ये ठेवल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोठडीही घेणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील पोलीस ठाण्यात असे चित्र क्वचितच दिसते. याउलट आरोपीची आपुलकीने चौकशी करणे, काही हवे नाही ते पाहणे, यामध्येच पोलीस मश्गुल असतात. आर्थिक हितसंबंधातून हे सर्व होत असताना पोलीस आणि आरोपींची जवळीकही वाढतेच. यामुळे ‘लॉकअप’मधील आरोपी गुन्हा केल्याचे तर विसरतोच शिवाय त्यालाही अगदी घरात असल्याप्रमाणेच वाटते. पोलिसांकडून मिळणाऱ्या अशाप्रकारच्या सन्मानाच्या वागणुकीमुळे आरोपीही मस्तावतात. लॉकअपमधून बाहेर पडताच दुसरा गुन्हा करण्यासाठी छातीठोकपणे तयार होतात. यातून गुन्हेगाराला एकप्रकारे गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहनच मिळते. आर्थिक हितसंबंधातून निर्माण झालेली दोघांमधील जवळीक समाजात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मारक ठरत आहे. सामान्याला कायद्याचा धाक दाखविणारे पोलीस सराईत गुन्हेगारांशी जवळीक साधून कायदा-सुव्यवस्था कशी राखणार, असाच प्रश्न उपस्थित होतो. पोलीस आणि पोलीस ठाणे म्हटले की, आजही सामान्य नागरिकांच्या अंगावर काटा येतो. असा सामान्य माणूस तक्रार देण्यास ठाण्यात गेल्यावर भेदरलेला असतो. अशावेळी तक्रारदाराला पोलिसांचे सहकार्य आवश्यक असते. आणि आरोपीवर कारवाई करण्याची त्याची अपेक्षा असते. बऱ्याचदा तक्रारदारालाच उलट प्रश्न विचारून पोलीस भंडावून सोडतात. त्यातच आरोपी ‘तगडा’ असेल तर पोलीस तक्रारदाराला आणखीणच कोंडीत पकडतात. पोलिसांच्या या वागणुकीपुढे तक्रारदारही हतबल होतो. आरोपींवर खाकीचा वचक कमी होत असल्याचे अनेकदा पहायला मिळते. यासाठी पोलिसांची कठोर भूमिका महत्त्वाची आहे. गुन्ह्यातील आरोपींची कसलीही मुलाहिजा न बाळगता त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. पोलिसांनी आरोपीला खाकीचे खरे दर्शन घडविल्यास आरोपीदेखील पुन्हा गुन्हा करण्याचे धाडस करणार नाही.