शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मानवी चुकांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 06:25 IST

भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून

पुणे : भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून,एकूण अपघातांपैकी ५७ टक्के प्राणघातक अपघातांमध्ये मानवी चुका हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे़ पुणे-मुंबई दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावरील गतवर्षी झालेल्या १५५ अपघातांच्या केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे़पुणे-नाशिक रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोलामागून बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यूझाला होता़ तसेच राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांत अनेक प्राणघातक अपघात झाले होते़ पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर गतवर्षी झालेल्या अपघातांपैकी ५४ अपघात हे सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान झाले आहेत़ त्याखालोखाल मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ३१ अपघात झाले होते़ या १५५ अपघातांत २४० वाहने आणि १६ पादचाºयांचा समावेश होता़ त्यात सर्वाधिक ४१ टक्के मोटारी, ४० टक्के ट्रक यांचा समावेश होता़ पुणे जिल्ह्णात गेल्यां वर्षी ९६५ प्राणघातक अपघात झाले असून त्यात १०६१ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता़ मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या १५५ अपघातापैकी ९९ अपघातात ११८ जणांना प्राण गमवावे लागले तसेच ३०० जण गंभीर जखमी झाले होते़ या अपघातांचया अभ्यास जे पी़ रिसर्च इंडिया ने ट्रक केला़ त्यात अनेक निष्कर्ष समोर आले आहेत़या अपघातांमध्ये कार आणि ट्रक यांचा ८० टक्के सहभाग होता़ त्यातील ५४ टक्के कारमधील किमान एका जणाचा मृत्यू झाला होता़ आणि ७१ टक्के वाहनांमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़ २१ टक्के ट्रकमधील एका जणाला मृत्यूलासामोरे जावे लागले, तर १८ टक्के ट्रकमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़मानवी चुकांमुळे झालेल्या अपघातात अतिवेगामुळे सर्वाधिक अपघात झाल्याचे दिसून येते़ एक्स्प्रेस-वेवर वाहनचालक लेनची शिस्त पाळताना दिसत नाही़ चुकीच्या पद्धतीने लेन कटिंग केल्यामुळे अपघाताचे प्रमाणही अधिक आहे़ त्याचबरोबर वाहन चालवताना चालकाला डुलकी लागणे त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला धडकून झालेल्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे़ वाहनचालकाने सीटबेल्ट न बांधल्यामुळे ५७ टक्के अपघाताताचे गांभीर्य वाढल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे़ 

टॅग्स :Accidentअपघात