शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

मानवी चुकांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 06:25 IST

भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून

पुणे : भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून,एकूण अपघातांपैकी ५७ टक्के प्राणघातक अपघातांमध्ये मानवी चुका हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे़ पुणे-मुंबई दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावरील गतवर्षी झालेल्या १५५ अपघातांच्या केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे़पुणे-नाशिक रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोलामागून बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यूझाला होता़ तसेच राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांत अनेक प्राणघातक अपघात झाले होते़ पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर गतवर्षी झालेल्या अपघातांपैकी ५४ अपघात हे सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान झाले आहेत़ त्याखालोखाल मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ३१ अपघात झाले होते़ या १५५ अपघातांत २४० वाहने आणि १६ पादचाºयांचा समावेश होता़ त्यात सर्वाधिक ४१ टक्के मोटारी, ४० टक्के ट्रक यांचा समावेश होता़ पुणे जिल्ह्णात गेल्यां वर्षी ९६५ प्राणघातक अपघात झाले असून त्यात १०६१ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता़ मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या १५५ अपघातापैकी ९९ अपघातात ११८ जणांना प्राण गमवावे लागले तसेच ३०० जण गंभीर जखमी झाले होते़ या अपघातांचया अभ्यास जे पी़ रिसर्च इंडिया ने ट्रक केला़ त्यात अनेक निष्कर्ष समोर आले आहेत़या अपघातांमध्ये कार आणि ट्रक यांचा ८० टक्के सहभाग होता़ त्यातील ५४ टक्के कारमधील किमान एका जणाचा मृत्यू झाला होता़ आणि ७१ टक्के वाहनांमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़ २१ टक्के ट्रकमधील एका जणाला मृत्यूलासामोरे जावे लागले, तर १८ टक्के ट्रकमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़मानवी चुकांमुळे झालेल्या अपघातात अतिवेगामुळे सर्वाधिक अपघात झाल्याचे दिसून येते़ एक्स्प्रेस-वेवर वाहनचालक लेनची शिस्त पाळताना दिसत नाही़ चुकीच्या पद्धतीने लेन कटिंग केल्यामुळे अपघाताचे प्रमाणही अधिक आहे़ त्याचबरोबर वाहन चालवताना चालकाला डुलकी लागणे त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला धडकून झालेल्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे़ वाहनचालकाने सीटबेल्ट न बांधल्यामुळे ५७ टक्के अपघाताताचे गांभीर्य वाढल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे़ 

टॅग्स :Accidentअपघात