शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खड्ड्यांमुळे वाढले अपघात

By admin | Updated: August 29, 2014 04:37 IST

गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे

हडपसर : गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे. रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे दुचाकीच्या अपघातांत वाढ झाली असून, वाहनांचा वेगही मंदावला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याची अद्याप तसदी घेतली नाही. आकाशवाणी ते लक्ष्मी कॉलनीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर नागरिकांना पायी चालण्यासाठी रस्ता मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर रस्त्याचे काम रखडले असून, अद्याप त्याला गती आली नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी काही दिवस काम गतीने केले, त्यानंतर अर्धवट राहिलेले काम बंद पडले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरीक कमालीचे त्रस्त झाले आहेत.झोपडपट्टीमधील नागरिकांना मध्यरात्रीपासून लहानग्यांना घेऊन कॉटवर बसावे लागले. संसार पाण्यात गेल्याने झोपडपट्टीधारकांचे मोठे नुकसान झाले. शाळा-महाविद्यालयांच्या मैदानावर तसेच उद्यानामध्येही पाण्याचे तळे साठले होते. भाजी मंडईमध्ये पाणी साठल्याने भाजी विक्रेत्यांची मोठी अडचण झाली. रवीदर्शन समोर पाणी जाण्यासाठी पावसाळी गटारयोजना नसल्यामुळे दोन फूट पाणी साठले होते, वैदूवाडी चौक, रामटेकडीच्या पुलाच्या बाजूला, तसेच फातिमानगर चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले होते. जुन्या पद्धतीच्या घरांच्या छप्परातून पाणी गळत होते. (वार्ताहर)