शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

खड्ड्यांमुळे वाढले अपघात

By admin | Updated: August 29, 2014 04:37 IST

गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे

हडपसर : गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे. रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे दुचाकीच्या अपघातांत वाढ झाली असून, वाहनांचा वेगही मंदावला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याची अद्याप तसदी घेतली नाही. आकाशवाणी ते लक्ष्मी कॉलनीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर नागरिकांना पायी चालण्यासाठी रस्ता मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर रस्त्याचे काम रखडले असून, अद्याप त्याला गती आली नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी काही दिवस काम गतीने केले, त्यानंतर अर्धवट राहिलेले काम बंद पडले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरीक कमालीचे त्रस्त झाले आहेत.झोपडपट्टीमधील नागरिकांना मध्यरात्रीपासून लहानग्यांना घेऊन कॉटवर बसावे लागले. संसार पाण्यात गेल्याने झोपडपट्टीधारकांचे मोठे नुकसान झाले. शाळा-महाविद्यालयांच्या मैदानावर तसेच उद्यानामध्येही पाण्याचे तळे साठले होते. भाजी मंडईमध्ये पाणी साठल्याने भाजी विक्रेत्यांची मोठी अडचण झाली. रवीदर्शन समोर पाणी जाण्यासाठी पावसाळी गटारयोजना नसल्यामुळे दोन फूट पाणी साठले होते, वैदूवाडी चौक, रामटेकडीच्या पुलाच्या बाजूला, तसेच फातिमानगर चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले होते. जुन्या पद्धतीच्या घरांच्या छप्परातून पाणी गळत होते. (वार्ताहर)