शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गावे समाविष्ट करण्याआधी पीएमआरडीएचा विकास आराखडा स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST

पुणे : महानगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांचा विकास आरखडा तयार करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ...

पुणे : महानगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांचा विकास आरखडा तयार करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) करत आहे. हा आरखडा अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. यामुळे गावे महानगरपालिकेने समाविष्ट करण्याआधी हा विकास आरखडा मंजूर करावा, अशी मागणी सूस ग्रामपंचायतीने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेत २३ गावांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ज्या गावांना याबाबत आक्षेप असेल त्यांना २३ तारखेपर्यंत सूचना व हरकती सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सूस ग्रामपंचायतीने उपसरपंच दिशा ससार यांनी त्यांच्या हरकती विभागीय आयुक्तांकडे सादर केल्या आहेत. महानगरपालिकेत जाण्यापूर्वी पीएमआरडीएने तयार केलेला विकास आरखडा पालिकेने मंजूर करावा. त्यानंतर गावे समाविष्ट करावी. हा आरखडा अंतिम होईपर्यंत करवसुली ही ग्रामपंचायतीप्रमाणेच सुरू ठेवावी किंवा

ग्रामपंचायत कराच्या २० टक्के दरवर्षी वाढ करून पाचव्या वर्षी शंभर टक्के करावी. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने पुणे मनपास द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

१९९७ मध्ये काही गावे पालिकेत समाविष्ट करताना पुणे प्रादेशिक योजनेमध्ये शासनाने गावामध्ये जमीन वापर बदल (झोनिंग – शेती व ना विकास विभागातून निवासी विभागामध्ये रुपांतर) करून ती पालिकेत समाविष्ट केली होती. त्याप्रमाणे आताही पीएमआरडीएने प्रादेशिक योजनेप्रमाणे गावातील जमिनीचे निवासी विभागामध्ये बदल करून ती पालिकेत समाविष्ट करावीत.

सूस गावाच्या बाजूला असलेल्या हिंजेवाडीचा भाग झपाट्याने विकसित होत असून नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. अशा वेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे मोठे रस्ते व सुनियोजित विकास करण्याकरिता नवीन महानगरपालिकेची अत्यंत आवश्यकता आहे. शासनस्तरावर याविषयी गांभीर्याने विचार व्हावा, असेही ससार म्हणाल्या.

चौकट

२०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील करआकारणी करताना लगतच्या मनापामधील मिळकतींचे मूल्यांकनाचे निकष लावून करआकारणी करण्यात आली. त्यामुळे अवास्तव करआकारणी या समाविष्ट ११ गावांमध्ये झाली. या गावांमध्ये अद्यापपर्यंत पायाभूत सोयीसुविधा पालिकेने उपलब्ध करून दिल्या नाहीत. या गावांचा विकास आराखडा नियोजन अजून झाले नाही. हा जो विस्कळीतपणा २३ गावांच्या बाबतीत प्रशासनाने करू नये.

कोट

२३ गावे समाविष्ट करताना या गावांत पायाभूत सोयीसुविधा किती कालावधीत उपलब्ध करून देणार? करआकारणी टप्प्याटप्प्याने करणार आहे का ? विकास आराखडा किती कालावधी मध्ये करणार? याचा कालबद्ध कार्यक्रम आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा व त्या कालावधीत अंमलबजावणी न झाल्यास गावे मनापा हद्दीमधून वगळण्याचा पर्याय उपलब्ध असावा तसेच प्रशासनाने आम्हाला याबाबत लेखी स्वरूपात द्यावे.

- दिशा ससार, उपसरपंच सूस.