शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

गावे समाविष्ट करण्याआधी पीएमआरडीएचा विकास आराखडा स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST

पुणे : महानगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांचा विकास आरखडा तयार करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ...

पुणे : महानगरपालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांचा विकास आरखडा तयार करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) करत आहे. हा आरखडा अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. यामुळे गावे महानगरपालिकेने समाविष्ट करण्याआधी हा विकास आरखडा मंजूर करावा, अशी मागणी सूस ग्रामपंचायतीने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. पुणे महानगरपालिकेत २३ गावांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ज्या गावांना याबाबत आक्षेप असेल त्यांना २३ तारखेपर्यंत सूचना व हरकती सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सूस ग्रामपंचायतीने उपसरपंच दिशा ससार यांनी त्यांच्या हरकती विभागीय आयुक्तांकडे सादर केल्या आहेत. महानगरपालिकेत जाण्यापूर्वी पीएमआरडीएने तयार केलेला विकास आरखडा पालिकेने मंजूर करावा. त्यानंतर गावे समाविष्ट करावी. हा आरखडा अंतिम होईपर्यंत करवसुली ही ग्रामपंचायतीप्रमाणेच सुरू ठेवावी किंवा

ग्रामपंचायत कराच्या २० टक्के दरवर्षी वाढ करून पाचव्या वर्षी शंभर टक्के करावी. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने पुणे मनपास द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

१९९७ मध्ये काही गावे पालिकेत समाविष्ट करताना पुणे प्रादेशिक योजनेमध्ये शासनाने गावामध्ये जमीन वापर बदल (झोनिंग – शेती व ना विकास विभागातून निवासी विभागामध्ये रुपांतर) करून ती पालिकेत समाविष्ट केली होती. त्याप्रमाणे आताही पीएमआरडीएने प्रादेशिक योजनेप्रमाणे गावातील जमिनीचे निवासी विभागामध्ये बदल करून ती पालिकेत समाविष्ट करावीत.

सूस गावाच्या बाजूला असलेल्या हिंजेवाडीचा भाग झपाट्याने विकसित होत असून नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. अशा वेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे मोठे रस्ते व सुनियोजित विकास करण्याकरिता नवीन महानगरपालिकेची अत्यंत आवश्यकता आहे. शासनस्तरावर याविषयी गांभीर्याने विचार व्हावा, असेही ससार म्हणाल्या.

चौकट

२०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील करआकारणी करताना लगतच्या मनापामधील मिळकतींचे मूल्यांकनाचे निकष लावून करआकारणी करण्यात आली. त्यामुळे अवास्तव करआकारणी या समाविष्ट ११ गावांमध्ये झाली. या गावांमध्ये अद्यापपर्यंत पायाभूत सोयीसुविधा पालिकेने उपलब्ध करून दिल्या नाहीत. या गावांचा विकास आराखडा नियोजन अजून झाले नाही. हा जो विस्कळीतपणा २३ गावांच्या बाबतीत प्रशासनाने करू नये.

कोट

२३ गावे समाविष्ट करताना या गावांत पायाभूत सोयीसुविधा किती कालावधीत उपलब्ध करून देणार? करआकारणी टप्प्याटप्प्याने करणार आहे का ? विकास आराखडा किती कालावधी मध्ये करणार? याचा कालबद्ध कार्यक्रम आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा व त्या कालावधीत अंमलबजावणी न झाल्यास गावे मनापा हद्दीमधून वगळण्याचा पर्याय उपलब्ध असावा तसेच प्रशासनाने आम्हाला याबाबत लेखी स्वरूपात द्यावे.

- दिशा ससार, उपसरपंच सूस.