शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आव्हाने स्वीकारा; मोठे व्हाल - अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:39 IST

देशाच्या विकासासाठी विज्ञानाची प्रगती होणे खूप गरजेचे आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत. विज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी कशा घडतात, याचा विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या विकासासाठी विज्ञानाची प्रगती होणे खूप गरजेचे आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत. विज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी कशा घडतात, याचा विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा. भावी पिढीची विचारसरणी तंत्रज्ञानामुळे प्रगत होत आहे. या क्षेत्रात काम करायचे असेल, तर सातत्याने नवनवे मार्ग शोधून अभ्यास करावा, असा सल्ला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित ८७ व्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत ‘शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांशी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. मंजू शर्मा, आयुका पुणेचे संचालक डॉ. सोमकराय चौधरी, प्रा. परमजित कुºहाणा उपस्थित होत्या.या राष्ट्रीय विज्ञान परिषदेस देशभरातून ३०० संशोधन करणारे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. १०० शास्रज्ञांनी यामधे सहभाग घेतला आहे. विज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस खूप वाढत आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात ज्या ज्या घडामोडी घडतात, त्या घडामोडींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला होता. या संवादामध्ये विविध शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.चौधरी म्हणाले, विज्ञानाच्या क्षेत्रात जे लहान लहान बदल होतात, त्या बदलांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. संशोधनातल्या मूळ संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. आकाशगंगा म्हणजे नेमके काय, आकाशामध्ये ज्या आंतरिक हालचाली होतात, त्या कशा होतात, ते पाहिले पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. कुराणा म्हणाल्या, भारतामधे कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.भारतामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होताना दिसतो आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी सातत्याने आपली बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. देशामध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु उत्पन्न ज्या प्रमाणात वाढायला हवे, त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये भारत नव्या तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डॉ. मोडक यांनी सूत्रसंचालन केले, तर दीपाली मालखेडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या