शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पीएम किसान योजनेत सर्वांचे आधार बंधनकारक, अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार

By नितीन चौधरी | Updated: January 17, 2025 12:32 IST

येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

पुणे : राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या २० हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक असून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. ही अट जानेवारीअखेर देण्यात येणाऱ्या १९ व्या हप्त्याला लागू नसेल. त्यापूर्वी सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या अटीमुळे एका पात्र कुटुंबात एकालाच लाभ देण्याची अंमलबजावणी होणार आहे.

पीएम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या ९६ लाख ६७ हजार इतकी आहे. त्यात भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या ९५ लाख ९५ हजार इतकी असून अजूनही ७८ हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तर ई केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या ९५ लाख १६ हजार इतकी आहे. तर अजूनही १ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेले नाही.बॅँक खात्याशी आधार संलग्न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९४ लाख ५५ हजार असून अद्याप १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही. तसेच अर्जाला स्वयंमान्यता न दिलेल्यांची संख्या सुमारे ३६ हजार आहे. त्यामुळेच योजनेच्या १९ हप्त्यांसाठी राज्यातील ९२ लाख ४२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने डिसेंबरमध्ये अॅग्रीस्टॅक योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यासह शेतकरी असल्याचा पुरावा देऊन त्याची जोडणी अधिकार अभिलेखालाही करण्यात येणार आहे. हे करताना शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत. ही योजना कृषी सहायक, तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्या समन्वयातून राबविली जाणार आहे. सध्या यावर या तिन्ही कर्मचारी संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे योजना प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी व शेतकरी ओळख क्रमांकाशिवाय पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी ही अट लागू नाही. मात्र, २० हप्त्यांसाठी या बाबी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या अटीची अंमलबजावणी करण्यापूर्वी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता पती, पत्नीच्या आधार क्रमांकासह कुटुंबातील १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सदस्यांची आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कुुटुंबातील एकाच सदस्याला लाभ देण्यात येणार आहे.