शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान योजनेत सर्वांचे आधार बंधनकारक, अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार

By नितीन चौधरी | Updated: January 17, 2025 12:32 IST

येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

पुणे : राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या २० हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक असून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. ही अट जानेवारीअखेर देण्यात येणाऱ्या १९ व्या हप्त्याला लागू नसेल. त्यापूर्वी सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या अटीमुळे एका पात्र कुटुंबात एकालाच लाभ देण्याची अंमलबजावणी होणार आहे.

पीएम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या ९६ लाख ६७ हजार इतकी आहे. त्यात भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या ९५ लाख ९५ हजार इतकी असून अजूनही ७८ हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तर ई केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या ९५ लाख १६ हजार इतकी आहे. तर अजूनही १ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेले नाही.बॅँक खात्याशी आधार संलग्न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९४ लाख ५५ हजार असून अद्याप १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही. तसेच अर्जाला स्वयंमान्यता न दिलेल्यांची संख्या सुमारे ३६ हजार आहे. त्यामुळेच योजनेच्या १९ हप्त्यांसाठी राज्यातील ९२ लाख ४२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने डिसेंबरमध्ये अॅग्रीस्टॅक योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यासह शेतकरी असल्याचा पुरावा देऊन त्याची जोडणी अधिकार अभिलेखालाही करण्यात येणार आहे. हे करताना शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत. ही योजना कृषी सहायक, तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्या समन्वयातून राबविली जाणार आहे. सध्या यावर या तिन्ही कर्मचारी संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे योजना प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी व शेतकरी ओळख क्रमांकाशिवाय पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी ही अट लागू नाही. मात्र, २० हप्त्यांसाठी या बाबी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या अटीची अंमलबजावणी करण्यापूर्वी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता पती, पत्नीच्या आधार क्रमांकासह कुटुंबातील १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सदस्यांची आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कुुटुंबातील एकाच सदस्याला लाभ देण्यात येणार आहे.