शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

सामूहिक सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:12 IST

संत निरंकारी मिशनच्या वतीने महाराष्ट्राच्या ५० व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर समागम स्थळावरच खारघर, नवी मुंबई येथे सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आयोजिलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध झाली.

हडपसर : संत निरंकारी मिशनच्या वतीने महाराष्ट्राच्या ५० व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर समागम स्थळावरच खारघर, नवी मुंबई येथे सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आयोजिलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध झाली. यामध्ये पुण्यातील वधू वरांचाही समावेश आहे.वधू-वरांपैकी ४० वर आणि ४१ वधू मुंबईतील होत्या, तर ४४ वर आणि ४६ वधू महाराष्ट्राच्या अन्य भागातून आल्या होत्या. १४ वर आणि ११ वधू देशाच्या विविध राज्यांतील होत्या. ज्यामध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, हरियाना, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. एक वर आणि एक वधू यू. एस. ए. वरून आले होते. शैक्षणिक व व्यवसाय या दृष्टिकोनातून पाहिले असता ३१ वर आणि २५ वधू पदवीधर आहेत. तर ५ वर आणि ११ वधू पदव्युत्तर पदवीधर आहेत. यातील वरांपैकी ६ इंजिनिअर व २ एमबीए आहेत, तर वधूंमध्ये २ इंजिनिअर, २ डॉक्टर व २ एमबीए आहेत. विशेष म्हणजे १८ वर व १३ वधू मिशनच्या बाहेरून आलेले होते. याचा अर्थ ३१ कुटुंबांनी संत निरंकारी मिशनच्या साध्या विवाह पद्धतीला पसंती दर्शवली. ३ वधू व ३ वर पुनर्विवाह करीत आहेत.विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपरिक ‘जयमाला’ आणि ‘सामायिक हार’ परिधान करण्याने झाला. त्यानंतर मधुर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या ४ ‘निरंकारी लावां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लावां’च्या शेवटी सद्गुरु माताजी व उपस्थित भाविक-भक्तगणांनी वधू-वरांवर पुष्पवर्षाव केला.सद्गुरु माता सविंदर हरदेवजीमहाराज यांच्या आशीर्वचनाने हा मनोहर सोहळा झाला. सद्गुरु माताजींनी नवदांपत्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचे व्हावे, अशा शुभेच्छा देतानाच सत्संग, स्मरण आणि निष्काम सेवा करण्याची प्रेरणा प्रदान केली.