शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

९९२ पाणीपुरवठा योजना ठप्प, महावितरणची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:38 IST

जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २,०७० पाणीपुरवठा योजनांची ४५ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलातील ८२७ पाणीपुरवठा योजनांचा २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे.

बारामती : जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २,०७० पाणीपुरवठा योजनांची ४५ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलातील ८२७ पाणीपुरवठा योजनांचा २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील १६५ पाणीपुरवठा योजनांचा २ कोटी ४४ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेकडो गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार बारामती मंडलात ८२७ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा २२ कोटी ९७ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, मुळशी, राजगुरुनगर विभागातील १६५ योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. १६५ योजनांची २ कोटी ४४ लाख थकीत आहे. वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चांगलेच चटके जाणवणार आहेत. पाणीपुरवठा बंद झाल्याने गावाची तहान भागविण्यासाठी पदाधिकाºयांची चांगलीच दमछाक होणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीवर कायमस्वरूपी तोडग्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. मात्र, वीजबिल भरण्यासाठी वसुलीअभावी पैशाची तजवीज करणार कशी, हा प्रश्न मात्र निरुत्तरितच आहे.ऐन उन्हाळ्यात वीजबिलाअभावी पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने जिल्ह्यातील २ हजार ७० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. बंद पडलेल्या ९२२ पाणीपुरवठा योजनांचा हिशेब पाहता, त्यावर अवलंबून असणाºया शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्याचे चित्र आहे.>पैशाची तजवीज करणार कशी ?बारामती मंडलमध्ये जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भोर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे.पुणे ग्रामीण मंडलमध्ये आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली, खेड व मावळ या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्ह्यात सर्वाधिकइंदापूर तालुक्यात १६१ पाणीपुरवठा योजनांचे ९.४७कोटी रुपये थकीत आहेत.मावळ तालुक्यात १५६- ७ कोटी ६४ लाख तर त्यानंतर खेड तालुक्यात ६ कोटी ७१ लाख थक बाकी आहे.वेल्हे तालुक्यात नसरापूर(ता. भोर)सह सर्वांत कमी ११८ ग्राहकांची ६१ लाख ८१हजार थकबाकी आहे.>शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंदनुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे़ अशा वेळी जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरुवातीलाच खंडित केला आहे. यामुळे शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने त्यांना आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी