शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

९९२ पाणीपुरवठा योजना ठप्प, महावितरणची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:38 IST

जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २,०७० पाणीपुरवठा योजनांची ४५ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलातील ८२७ पाणीपुरवठा योजनांचा २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे.

बारामती : जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २,०७० पाणीपुरवठा योजनांची ४५ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलातील ८२७ पाणीपुरवठा योजनांचा २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील १६५ पाणीपुरवठा योजनांचा २ कोटी ४४ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेकडो गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार बारामती मंडलात ८२७ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा २२ कोटी ९७ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, मुळशी, राजगुरुनगर विभागातील १६५ योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. १६५ योजनांची २ कोटी ४४ लाख थकीत आहे. वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चांगलेच चटके जाणवणार आहेत. पाणीपुरवठा बंद झाल्याने गावाची तहान भागविण्यासाठी पदाधिकाºयांची चांगलीच दमछाक होणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीवर कायमस्वरूपी तोडग्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. मात्र, वीजबिल भरण्यासाठी वसुलीअभावी पैशाची तजवीज करणार कशी, हा प्रश्न मात्र निरुत्तरितच आहे.ऐन उन्हाळ्यात वीजबिलाअभावी पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने जिल्ह्यातील २ हजार ७० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. बंद पडलेल्या ९२२ पाणीपुरवठा योजनांचा हिशेब पाहता, त्यावर अवलंबून असणाºया शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्याचे चित्र आहे.>पैशाची तजवीज करणार कशी ?बारामती मंडलमध्ये जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भोर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे.पुणे ग्रामीण मंडलमध्ये आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली, खेड व मावळ या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्ह्यात सर्वाधिकइंदापूर तालुक्यात १६१ पाणीपुरवठा योजनांचे ९.४७कोटी रुपये थकीत आहेत.मावळ तालुक्यात १५६- ७ कोटी ६४ लाख तर त्यानंतर खेड तालुक्यात ६ कोटी ७१ लाख थक बाकी आहे.वेल्हे तालुक्यात नसरापूर(ता. भोर)सह सर्वांत कमी ११८ ग्राहकांची ६१ लाख ८१हजार थकबाकी आहे.>शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंदनुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे़ अशा वेळी जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरुवातीलाच खंडित केला आहे. यामुळे शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने त्यांना आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी