शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

९९२ पाणीपुरवठा योजना ठप्प, महावितरणची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:38 IST

जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २,०७० पाणीपुरवठा योजनांची ४५ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलातील ८२७ पाणीपुरवठा योजनांचा २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे.

बारामती : जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २,०७० पाणीपुरवठा योजनांची ४५ कोटी ९० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये बारामती मंडलातील ८२७ पाणीपुरवठा योजनांचा २२ कोटी ९७ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील १६५ पाणीपुरवठा योजनांचा २ कोटी ४४ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेकडो गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार बारामती मंडलात ८२७ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा २२ कोटी ९७ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर, पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, मुळशी, राजगुरुनगर विभागातील १६५ योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. १६५ योजनांची २ कोटी ४४ लाख थकीत आहे. वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चांगलेच चटके जाणवणार आहेत. पाणीपुरवठा बंद झाल्याने गावाची तहान भागविण्यासाठी पदाधिकाºयांची चांगलीच दमछाक होणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीवर कायमस्वरूपी तोडग्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. मात्र, वीजबिल भरण्यासाठी वसुलीअभावी पैशाची तजवीज करणार कशी, हा प्रश्न मात्र निरुत्तरितच आहे.ऐन उन्हाळ्यात वीजबिलाअभावी पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने जिल्ह्यातील २ हजार ७० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. बंद पडलेल्या ९२२ पाणीपुरवठा योजनांचा हिशेब पाहता, त्यावर अवलंबून असणाºया शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्याचे चित्र आहे.>पैशाची तजवीज करणार कशी ?बारामती मंडलमध्ये जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भोर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे.पुणे ग्रामीण मंडलमध्ये आंबेगाव, जुन्नर, मुळशी, हवेली, खेड व मावळ या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्ह्यात सर्वाधिकइंदापूर तालुक्यात १६१ पाणीपुरवठा योजनांचे ९.४७कोटी रुपये थकीत आहेत.मावळ तालुक्यात १५६- ७ कोटी ६४ लाख तर त्यानंतर खेड तालुक्यात ६ कोटी ७१ लाख थक बाकी आहे.वेल्हे तालुक्यात नसरापूर(ता. भोर)सह सर्वांत कमी ११८ ग्राहकांची ६१ लाख ८१हजार थकबाकी आहे.>शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंदनुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे़ अशा वेळी जिल्ह्यातील ९९२ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरुवातीलाच खंडित केला आहे. यामुळे शेकडो गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने त्यांना आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी