शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जिल्ह्यातील २३ धोकादायक गावांसाठी आलेले ९० लाख खर्चाविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीतनंतर पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचा व भुस्खलनचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीतनंतर पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचा व भुस्खलनचा धोका असलेल्या २३ गावांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या गावांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक कामे करण्यासाठी शासनाने दिलेला ९० लाखांचा निधी गेल्या दोन वर्षांपासून खर्चाविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे. आम्हाला तात्पुरत्या स्वरुपाची कामे नको तर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करत गावांनी निधी नाकारले असल्याचे संबंधित अधिका-यांनी सांगितले.

जिल्ह्यात ३० जुलै २०१४ मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २३ गावांमध्ये दरडी कोसळण्याचा व भूस्खलनचा धोका असल्याचे समोर आले. त्यानंतर या गावांच्या सुरक्षितेचा व पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत आला. परंतु शासन आणि प्रशासन स्तरावर हा विषय गांभीर्याने घेतला नाही. जिल्ह्यातील या २३ धोकादायक गावांमध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने डोंगर उतारावर चर काढणे, धोकादायक असलेले डोंगरकडे तोडणे, बांबूच्या झाडांची लागवड करणे ही कामे करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला ९० लाख रुपयांचा निधी दिला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून हा निधी खर्चाविना तसाच पडून आहे. यामुळेच दरडप्रवण गावे आजही मृत्यूच्या छायेत असून या गावांवरील धोका कायम आहे.

------

तात्पुरती कामे नको कायमस्वरूपी पुनर्वसन करा

जिल्ह्यातील २३ धोकादायक गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध कामे करण्यासाठी शासनाने ९० लाख रुपयांचा निधी दिला आहे. परंतु बहुतेक सर्व गावांनी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची काम नको तर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करत निधी खर्च करण्यास नकार दिला आहे. यामुळेच हा निधी खर्च झालेला नाही.

- विठ्ठल बनोटे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी