शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

जिल्ह्यातील २३ धोकादायक गावांसाठी आलेले ९० लाख खर्चाविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीतनंतर पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचा व भुस्खलनचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीतनंतर पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचा व भुस्खलनचा धोका असलेल्या २३ गावांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या गावांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक कामे करण्यासाठी शासनाने दिलेला ९० लाखांचा निधी गेल्या दोन वर्षांपासून खर्चाविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे. आम्हाला तात्पुरत्या स्वरुपाची कामे नको तर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करत गावांनी निधी नाकारले असल्याचे संबंधित अधिका-यांनी सांगितले.

जिल्ह्यात ३० जुलै २०१४ मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २३ गावांमध्ये दरडी कोसळण्याचा व भूस्खलनचा धोका असल्याचे समोर आले. त्यानंतर या गावांच्या सुरक्षितेचा व पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत आला. परंतु शासन आणि प्रशासन स्तरावर हा विषय गांभीर्याने घेतला नाही. जिल्ह्यातील या २३ धोकादायक गावांमध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने डोंगर उतारावर चर काढणे, धोकादायक असलेले डोंगरकडे तोडणे, बांबूच्या झाडांची लागवड करणे ही कामे करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला ९० लाख रुपयांचा निधी दिला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून हा निधी खर्चाविना तसाच पडून आहे. यामुळेच दरडप्रवण गावे आजही मृत्यूच्या छायेत असून या गावांवरील धोका कायम आहे.

------

तात्पुरती कामे नको कायमस्वरूपी पुनर्वसन करा

जिल्ह्यातील २३ धोकादायक गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध कामे करण्यासाठी शासनाने ९० लाख रुपयांचा निधी दिला आहे. परंतु बहुतेक सर्व गावांनी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची काम नको तर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करत निधी खर्च करण्यास नकार दिला आहे. यामुळेच हा निधी खर्च झालेला नाही.

- विठ्ठल बनोटे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी