शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शहरातील २५ कचरा प्रकल्पांपैकी ९ प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:19 IST

महापालिका प्रशासनाने शहरात निर्माण होणाऱ्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून

पुणे : महापालिका प्रशासनाने शहरात निर्माण होणाऱ्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत २५ कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले; परंतु त्यांपैकी अनेक प्रकल्प बंद पडले असून, काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कधी सुरूच झालेले नाहीत. तर, काही प्रकल्प देखभाल-दुरुस्तीसाठी सातत्याने बंद ठेवले जातात. कचरा प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.सजग नागरिक मंचाने केलेल्या पाहणीत आणि प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून वरील बाब समोर आली आहे.यामध्ये शहरात दररोज हजारो टन कचरा निर्माण होतो. शहरातील कचरा शहरात जिरवण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. यामुळे शहराच्या विविध भागांत पाच-दहा टन असे लहान-लहान स्वरूपाचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आले.तर येरवडा, वडगाव १, वडगाव २, घोले रोड, वानवडी या ५ प्रकल्पांत एकही युनिट वीजनिर्मिती झालेली नाही. तसेच पेशवे पार्क २, घोले रोड, वडगाव १, वडगाव २ या प्रकल्पांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी कचरा जिरवला गेला असून, एकूण दररोज १२५ टन कचरा जिरविण्याची क्षमता असणाºया या २५ प्रकल्पांत मिळून सरासरी ६५ टक्के कचरा पाठविला गेला असल्याचे आढळून आले आहे. या सर्व प्रकल्पात पाठवलेल्या कचºयापासून या प्रकल्पांमध्ये फक्त ५३ टक्के क्षमतेने गॅस निर्मिती झाली आहे.तसेच, या ५ टनांच्या २५ प्रकल्पांमध्ये दरमहा ४,५०,००० युनिट वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे, ज्यातून मनपाचे दरमहा २८ लाख रुपये वीजबिल बचत होऊन वर्षभरात ३.५० कोटी रुपये वाचणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात वर्षभरात वीजनिर्मिती फक्त ३१ टक्के क्षमतेने झाली असल्याचे सजगचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याबाबत प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याने नागरिकांच्या पैशांचा कचरा होत असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे.