शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

८१ टक्के उद्योगांचे गाडे अजूनही ‘ऑफ-ट्रॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:10 IST

पुणे : जिल्ह्यातल्या ८१ टक्के उद्योगांना अजूनही कोरोनापूर्व उत्पादन स्तर गाठता आलेला नाही. गेल्या दीड वर्षात कोरोना संसर्गाच्या दोन ...

पुणे : जिल्ह्यातल्या ८१ टक्के उद्योगांना अजूनही कोरोनापूर्व उत्पादन स्तर गाठता आलेला नाही. गेल्या दीड वर्षात कोरोना संसर्गाच्या दोन लाटा आल्या. यामुळे टाळेबंदी, निर्बंध, आर्थिक मंदी अशी संकटे उद्योगांवर आली. या परिस्थितीतून उद्योग-व्यवसाय मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अँग्रिकल्चर (एमसीसीआयए)ने कोरोना साथीच्या काळात केलेल्या चौदाव्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातल्या दीडशेपेक्षा जास्त संस्था या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. कोरोनापूर्व स्थिती गाठण्यासाठी पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला अजूनही दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये स्थिती काहीशी सुधारली असून उत्पादन पातळी एक टक्क्याने वाढून ७० टक्क्यांवर गेल्याचे बहुतेक कंपन्यांनी सांगितले. अजूनही तीस टक्के कर्मचारी वर्ग कामावर नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सत्तर टक्के मनुष्यबळ काम करत आहे.

कोरोना पूर्व काळातील उत्पादन पातळी कधीपर्यंत गाठली जाईल, असा प्रश्न विचारला असता केवळ १९ टक्के कंपन्यांनी कोरोनापूर्व उत्पादन पातळी गाठल्याचे सांगितले. म्हणजेच जिल्ह्यातल्या ८१ टक्के कंपन्यांना अजूनही कोरोना पूर्व उत्पादन पातळी गाठता आलेली नाही. सर्वेक्षण झालेल्या कंपन्यांपैकी २९ टक्के कंपन्यांनी सांगितले की येत्या तीन महिन्यांत आम्ही कोरोनापूर्व उत्पादन स्तर गाठू तर २४ टक्के कंपन्यांनी ३ ते सहा महिने प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज व्यक्त केला. सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल, असे २७ टक्के कंपन्यांना वाटते.

सर्वेक्षण झालेल्या कंपन्यांमध्ये अतिलघू, लघू, मध्यम आणि मोठ्या कंपन्या अनुक्रमे २०, २२, ३० आणि २८ टक्के होत्या. या सर्व कंपन्यांमधल्या ६९ टक्के कंपन्या उत्पादन क्षेत्रातल्या आहेत. सेवा क्षेत्रातल्या कंपन्या १३ टक्के आहेत तर १८ टक्के कंपन्या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आहेत.