शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एका एकरात ७० टन उसाचे उत्पादन

By admin | Updated: February 13, 2017 01:20 IST

कोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत

संजय देशमुख / रांजणगाव गणपतीकोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत ५ फूट अंतरावर लागवड केली. अवघ्या १० महिन्यांत ७० टनाचे उत्पादन घेऊन उसाचे थळ न पेटविता ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करुन ते तसेच दोन ओळीत ठेवून पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केला आहे. त्यामळे ऊस तुटून जाऊन दीड महिना झाला तरी अद्याप त्या खोडवा उसाला पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही. शिवाय रोटोव्हेटरमुळे ऊसतोडणी मजुराकंडून जमिनीच्यावर राहिलेली उसाची धसकटे जमिनीलगत तुटली जाऊन उसाला जमिनीतून जास्त प्रमाणात कोंब फुटून उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्या पाचटावर अल्पसा युरिया मारल्याने पाचट लवकर कुजण्यास मदत होते, हे कुजलेले पाचट पिकाला सेंद्रिय खत म्हणून फायदेशीर होते आणि उत्पन्नात मोठी भर पडत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.आजच्या आधुनिक युगात शेती व्यवसायातही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. अनेक शेतकरी पांरपरिक शेतीपद्धती ऐवजी विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये करु लागल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे. भाजीपाला, फळबागा, फुलझाडे तसेच कांदा, उसासारखे नगदी पिकांचे उत्पादन घेताना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळविता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यातलेच नवीन तंत्रज्ञान मल्चिंग पेपरचा वापर म्हणजेच आच्छादनाचाही मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध प्रकारची पिके घेताना वापर करू लागले आहेत. आज टोमॅटो, मिरची, काकडीसारखा भाजीपाला, कलिगंड, खरबूज, स्ट्रॉबेरीसारखी फळासाठी मल्चिंग पेपर आणि उसासारख्या नगदी पिकात ऊस तुटून गेल्यानंतर पाचट न जाळता त्याच पाचटाचा उसाच्या खोडवा पिकात आच्छादन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उसाचे पाचट, वाळलेले गवत, भाताचे तूस, लाकडाचा भुसा, झाडांची वाळलेली पाने आणि पॉलिथिनचा मल्चिंग पेपर पिकांना आच्छादन म्हणून वापरला जातो. आच्छादनापैकी मल्चिंग पेपर सोडल्यास इतरांचा कालांतराने कुजून सेंद्रिय खतात रूपांतर होते आणि त्याचा फायदा पिकाला होतो. परिणामी खताचीही बचत होते. एकंदरीतच आच्छादनाच्या वापरामुळे, पाणी, खते व आंतरमशागतीच्या खर्चात मोठी बचत होऊन दर्जेदार व भरपूर उत्पादन मिळत आहे. पिकात आच्छादनाचा वापर करावा, असे आवाहन संभाजी गायकवाड व पी. बी. वामन यांनी केले आहे.