शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

एका एकरात ७० टन उसाचे उत्पादन

By admin | Updated: February 13, 2017 01:20 IST

कोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत

संजय देशमुख / रांजणगाव गणपतीकोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत ५ फूट अंतरावर लागवड केली. अवघ्या १० महिन्यांत ७० टनाचे उत्पादन घेऊन उसाचे थळ न पेटविता ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करुन ते तसेच दोन ओळीत ठेवून पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केला आहे. त्यामळे ऊस तुटून जाऊन दीड महिना झाला तरी अद्याप त्या खोडवा उसाला पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही. शिवाय रोटोव्हेटरमुळे ऊसतोडणी मजुराकंडून जमिनीच्यावर राहिलेली उसाची धसकटे जमिनीलगत तुटली जाऊन उसाला जमिनीतून जास्त प्रमाणात कोंब फुटून उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्या पाचटावर अल्पसा युरिया मारल्याने पाचट लवकर कुजण्यास मदत होते, हे कुजलेले पाचट पिकाला सेंद्रिय खत म्हणून फायदेशीर होते आणि उत्पन्नात मोठी भर पडत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.आजच्या आधुनिक युगात शेती व्यवसायातही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. अनेक शेतकरी पांरपरिक शेतीपद्धती ऐवजी विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये करु लागल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे. भाजीपाला, फळबागा, फुलझाडे तसेच कांदा, उसासारखे नगदी पिकांचे उत्पादन घेताना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळविता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यातलेच नवीन तंत्रज्ञान मल्चिंग पेपरचा वापर म्हणजेच आच्छादनाचाही मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध प्रकारची पिके घेताना वापर करू लागले आहेत. आज टोमॅटो, मिरची, काकडीसारखा भाजीपाला, कलिगंड, खरबूज, स्ट्रॉबेरीसारखी फळासाठी मल्चिंग पेपर आणि उसासारख्या नगदी पिकात ऊस तुटून गेल्यानंतर पाचट न जाळता त्याच पाचटाचा उसाच्या खोडवा पिकात आच्छादन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उसाचे पाचट, वाळलेले गवत, भाताचे तूस, लाकडाचा भुसा, झाडांची वाळलेली पाने आणि पॉलिथिनचा मल्चिंग पेपर पिकांना आच्छादन म्हणून वापरला जातो. आच्छादनापैकी मल्चिंग पेपर सोडल्यास इतरांचा कालांतराने कुजून सेंद्रिय खतात रूपांतर होते आणि त्याचा फायदा पिकाला होतो. परिणामी खताचीही बचत होते. एकंदरीतच आच्छादनाच्या वापरामुळे, पाणी, खते व आंतरमशागतीच्या खर्चात मोठी बचत होऊन दर्जेदार व भरपूर उत्पादन मिळत आहे. पिकात आच्छादनाचा वापर करावा, असे आवाहन संभाजी गायकवाड व पी. बी. वामन यांनी केले आहे.