शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

एका एकरात ७० टन उसाचे उत्पादन

By admin | Updated: February 13, 2017 01:20 IST

कोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत

संजय देशमुख / रांजणगाव गणपतीकोंढापुरी येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी ज्ञानोबा गायकवाड यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात एक डोळा पद्धतीने २६५ उसाच्या जातीची दोन ओळीत ५ फूट अंतरावर लागवड केली. अवघ्या १० महिन्यांत ७० टनाचे उत्पादन घेऊन उसाचे थळ न पेटविता ट्रॅक्टर रोटाव्हेटरच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करुन ते तसेच दोन ओळीत ठेवून पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केला आहे. त्यामळे ऊस तुटून जाऊन दीड महिना झाला तरी अद्याप त्या खोडवा उसाला पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही. शिवाय रोटोव्हेटरमुळे ऊसतोडणी मजुराकंडून जमिनीच्यावर राहिलेली उसाची धसकटे जमिनीलगत तुटली जाऊन उसाला जमिनीतून जास्त प्रमाणात कोंब फुटून उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्या पाचटावर अल्पसा युरिया मारल्याने पाचट लवकर कुजण्यास मदत होते, हे कुजलेले पाचट पिकाला सेंद्रिय खत म्हणून फायदेशीर होते आणि उत्पन्नात मोठी भर पडत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.आजच्या आधुनिक युगात शेती व्यवसायातही आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. अनेक शेतकरी पांरपरिक शेतीपद्धती ऐवजी विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये करु लागल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे. भाजीपाला, फळबागा, फुलझाडे तसेच कांदा, उसासारखे नगदी पिकांचे उत्पादन घेताना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळविता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यातलेच नवीन तंत्रज्ञान मल्चिंग पेपरचा वापर म्हणजेच आच्छादनाचाही मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध प्रकारची पिके घेताना वापर करू लागले आहेत. आज टोमॅटो, मिरची, काकडीसारखा भाजीपाला, कलिगंड, खरबूज, स्ट्रॉबेरीसारखी फळासाठी मल्चिंग पेपर आणि उसासारख्या नगदी पिकात ऊस तुटून गेल्यानंतर पाचट न जाळता त्याच पाचटाचा उसाच्या खोडवा पिकात आच्छादन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उसाचे पाचट, वाळलेले गवत, भाताचे तूस, लाकडाचा भुसा, झाडांची वाळलेली पाने आणि पॉलिथिनचा मल्चिंग पेपर पिकांना आच्छादन म्हणून वापरला जातो. आच्छादनापैकी मल्चिंग पेपर सोडल्यास इतरांचा कालांतराने कुजून सेंद्रिय खतात रूपांतर होते आणि त्याचा फायदा पिकाला होतो. परिणामी खताचीही बचत होते. एकंदरीतच आच्छादनाच्या वापरामुळे, पाणी, खते व आंतरमशागतीच्या खर्चात मोठी बचत होऊन दर्जेदार व भरपूर उत्पादन मिळत आहे. पिकात आच्छादनाचा वापर करावा, असे आवाहन संभाजी गायकवाड व पी. बी. वामन यांनी केले आहे.