शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कर्मदरिद्री प्रशासनाला ६,५६५ लसी शिल्लक राहिल्यावर सुचले शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना साथीची तीव्रता लक्षात घेता लसीकरण मोहिमेतील एक-एक दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना साथीची तीव्रता लक्षात घेता लसीकरण मोहिमेतील एक-एक दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. १९) राज्य सरकारवर ताशेरे ओढले. त्याच दिवशी पुणे महापालिकेने उपलब्ध असलेल्या साडेसात हजार कोविशिल्डपैकी तब्बल ६ हजार ५६५ डोस शिल्लक ठेवले. एकीकडे लस मिळत नसल्याच्या चिंतेत पुणेकर आहेत, पण त्याच वेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती पराकोटीचे नियोजनशून्य आहेत याचा दाखला या शिल्लक राहिलेल्या लसींनी पुणेकरांना दिला आहे.

शहरात चार दिवसांपासून ठप्प झालेले लसीकरण बुधवारी पुन्हा सुरू झाले. या लसीकरणासाठी महापालिकेला कोविशिल्ड लसीचे साडेसात हजार डोस मिळाले होते. सुमारे ७३ लसीकरण केंद्रांवर लसीचे प्रत्येकी १०० डोस पोहोचवण्यात आले. या लसी केवळ दुसऱ्या डोससाठीच द्याव्यात तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत अशांचेच लसीकरण करावे, अशी स्पष्ट सूचना राज्य शासनाने महापालिकेला दिली होती. या नियमाच्या बंधनामुळे केवळ ९३५ पुणेकरांचे लसीकरण बुधवारी होऊ शकले.

लस शिल्लक असूनही शासकीय सूचनांच्या अडथळ्यांमुळे ती पुणेकरांना दिली जात नव्हती. परिणामी बुधवारी दिवसभर सर्वच केंद्रांवरील लसीकरण यंत्रणा बसून होती. अखेरीस दुपारी महापालिकेने राज्य शासनाशी संपर्क साधला. कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसांची अट पूर्ण करणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याने राज्य शासनाला कळवण्यात आले. तेव्हा दुपारी तीननंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला डोसही द्यावा, असे राज्याकडून सांगण्यात आले. मात्र ही सूचना सर्व केंद्रांपर्यंत पोहोचेपर्यंत लसीकरणाची वेळ संपली होती. लसीकरण केंद्रांवरील बेभरवशाच्या कारभारामुळे दिवसभर ताटकळलेले पुणेकरही वैतागून, दमून गेले होते. राज्य शासनातील आणि महापालिकेतील भोंगळ अधिकाऱ्यांमुळे मधल्या मध्ये लसीकरण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मात्र कारण नसताना पुणेकरांच्या नाराजीचा सामना करावा लागला. लसीकरणासाठी आलेल्या पुणेकरांच्या प्रश्नांची उत्तरे देताना ही मंडळी थकून गेली. यातच बुधवारचा आख्खा दिवस वाया गेला.

चौकट

अनुत्तरीत प्रश्न

१) वास्तविक ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेले किती पुणेकर आहेत याची संपूर्ण माहिती महापालिकेकडेच उपलब्ध आहे. त्यामुळे बुधवारच्या लसीकरणासाठी कितीजण येऊ शकतात याचा अंदाज महापालिकेला काढता आला असता. तसा अंदाज घेतला असता तर मग राज्य शासनाने घातलेले बंधन पुण्यासाठी अयोग्य असल्याचे महापालिका ठामपणे सांगू शकली असती. महापालिकेने राज्य शासनाला हे सांगितले होते का याचे उत्तर मिळू शकलेले नाही.

२) महापालिकेने पुरेशी कल्पना दिल्यानंतरही राज्य शासनाने ‘पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच लस द्यावी,’ हा हेका चालू ठेवला का याचेही उत्तर मिळालेले नाही.

३) चार दिवसांनी होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा आढावा वेळोवेळी घेण्यात आला. लसीकरण केंद्रांवर हस्तक्षेप करणाऱ्या ‘माननीयां’नी या वेळी काय भूमिका घेतली?

४) लस शिल्लक राहिल्यास काय करावे याची सूचना लसीकरण सुरू होण्यापूर्वीच राज्य आणि महापालिका प्रशासनाने का दिली नाही?

५) किमान ४५ वर्षे वयावरील नागरिकांना तरी पहिला डोस देण्यासंदर्भात कोविन पोर्टलवरील पर्याय खुला का केला नाही?

चौकट

‘राज्याचे स्पष्ट आदेश असल्याने...’

“कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ८४ दिवसांनीच द्यावा, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिल्याने सर्व लसीकरण केंद्रांवर हा निकष पूर्ण करणाऱ्या नागरिकांचेच लसीकरण होऊ शकले. हे निकष पूर्ण करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने, लस वाया जाऊ नये म्हणून महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालकांशी संपर्क साधला. तेव्हा दुपारी तीन वाजता शासनाकडून ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याबाबत सांगण्यात आले. बुधवारी याची अंमलबजावणी होऊ शकली नसली तरी गुरुवारपासून त्याची सुरुवात होईल,” असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

---------------------