शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५६ हजार शेतकरी महाडिबीट पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST

पुणे : सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची शेतकऱ्यांची दगदग कृषी विभागाने कमी केली आहे. सर्व योजना एकाच अर्जात ...

पुणे : सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची शेतकऱ्यांची दगदग कृषी विभागाने कमी केली आहे. सर्व योजना एकाच अर्जात बसवणाऱ्या कृषी विभागाच्या महाडीबीटी (डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर- थेट लाभार्थी हस्तांतर) या संकेतस्थळावर जिल्ह्यातील तब्बल ५६ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सरकारच्या योजनांसाठीची जिल्ह्यातील लाभार्थीची ही विक्रमी संख्या आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याने यात आणखी वाढ होईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना आहेत. सरकारच्या कृषी खात्यातंर्गत असलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात. प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्याला स्वतंत्र अर्ज करावा लागतो. त्यात त्याचा वेळ जातो, शिवाय प्रत्यक्ष लाभ मिळण्यालाही विलंब होतो. कृषी विभागाने आता यासाठी महाडीबीटी हे संकेतस्थळ एनआयसी (राष्ट्रीय माहिती केंद्र) च्या साह्याने विकसीत केले आहे. त्याची माहिती सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून शेतकºयापर्यंत पोहचवली आहे.

अशी करायची नोंदणी

महाडीबीटी महाआयटी या संकेतस्थळावर गेले की शेतकरी योजना असा पर्याय आहे. त्यावर क्लिक केले की शेतीसंबधी व योजनांमध्ये असलेल्या वस्तूंची नावे येतात. त्यातील वस्तू निश्चित केली की ती कोणत्या योजनेत बसते त्याची माहिती येते. त्या योजनेच्या पर्यायावर क्लिक करून त्यात दिलेला अर्ज लिहायचा. शुल्क जमा करायचे. लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल, बँक खाते यांचे लिकिंग गरजेचे आहे.

असे ठरणार नाव

प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी तालुका कार्यालयातून होईल. जास्त अर्जदार असतील तर सोडत काढली जाईल व निश्चित झालेल्या लाभार्थीला संमती संदेश मिळेल. त्यानंतर त्याने स्वखर्चाने ती वस्तू खरेदी करायची. त्याची पावती व अन्य माहिती त्याच संकतेस्थळावर द्यायची. ती तालुका कार्यालयाकडून जिल्हा कार्यालयाकडे पाठवली जाईल.

काय आहे मदत

यात ट्रॅक्टरसाठी १ ते सव्वा लाख रूपये अनुदान आहे. ठिबकसाठी किंमतीच्या ५५ टक्के मदत मिळते. शेती अवजारे व शेतीसंबधीच्या अन्य अवजारांमध्येही किंमतीच्या ४० ते ५० टक्के अनुदान मिळते. या योजनेमुळे हे अनुदान लाभार्थीच्या थेट खात्यात जमा होईल.

शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी कृषी विभागाने ही योजना तयार केली आहे. यामुळे आता लाभार्थीच्या थेट खात्यातच योजनेसाठीचे पैसे जमा होतील. सोडतीची पद्धत असल्याने यात चांगली पारदर्शकता आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने जास्तीत जास्त शेतकºयांनी यात सहभागी व्हावे.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक