शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५६ हजार शेतकरी महाडिबीट पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST

पुणे : सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची शेतकऱ्यांची दगदग कृषी विभागाने कमी केली आहे. सर्व योजना एकाच अर्जात ...

पुणे : सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची शेतकऱ्यांची दगदग कृषी विभागाने कमी केली आहे. सर्व योजना एकाच अर्जात बसवणाऱ्या कृषी विभागाच्या महाडीबीटी (डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर- थेट लाभार्थी हस्तांतर) या संकेतस्थळावर जिल्ह्यातील तब्बल ५६ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सरकारच्या योजनांसाठीची जिल्ह्यातील लाभार्थीची ही विक्रमी संख्या आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याने यात आणखी वाढ होईल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना आहेत. सरकारच्या कृषी खात्यातंर्गत असलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात. प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्याला स्वतंत्र अर्ज करावा लागतो. त्यात त्याचा वेळ जातो, शिवाय प्रत्यक्ष लाभ मिळण्यालाही विलंब होतो. कृषी विभागाने आता यासाठी महाडीबीटी हे संकेतस्थळ एनआयसी (राष्ट्रीय माहिती केंद्र) च्या साह्याने विकसीत केले आहे. त्याची माहिती सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून शेतकºयापर्यंत पोहचवली आहे.

अशी करायची नोंदणी

महाडीबीटी महाआयटी या संकेतस्थळावर गेले की शेतकरी योजना असा पर्याय आहे. त्यावर क्लिक केले की शेतीसंबधी व योजनांमध्ये असलेल्या वस्तूंची नावे येतात. त्यातील वस्तू निश्चित केली की ती कोणत्या योजनेत बसते त्याची माहिती येते. त्या योजनेच्या पर्यायावर क्लिक करून त्यात दिलेला अर्ज लिहायचा. शुल्क जमा करायचे. लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल, बँक खाते यांचे लिकिंग गरजेचे आहे.

असे ठरणार नाव

प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी तालुका कार्यालयातून होईल. जास्त अर्जदार असतील तर सोडत काढली जाईल व निश्चित झालेल्या लाभार्थीला संमती संदेश मिळेल. त्यानंतर त्याने स्वखर्चाने ती वस्तू खरेदी करायची. त्याची पावती व अन्य माहिती त्याच संकतेस्थळावर द्यायची. ती तालुका कार्यालयाकडून जिल्हा कार्यालयाकडे पाठवली जाईल.

काय आहे मदत

यात ट्रॅक्टरसाठी १ ते सव्वा लाख रूपये अनुदान आहे. ठिबकसाठी किंमतीच्या ५५ टक्के मदत मिळते. शेती अवजारे व शेतीसंबधीच्या अन्य अवजारांमध्येही किंमतीच्या ४० ते ५० टक्के अनुदान मिळते. या योजनेमुळे हे अनुदान लाभार्थीच्या थेट खात्यात जमा होईल.

शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी कृषी विभागाने ही योजना तयार केली आहे. यामुळे आता लाभार्थीच्या थेट खात्यातच योजनेसाठीचे पैसे जमा होतील. सोडतीची पद्धत असल्याने यात चांगली पारदर्शकता आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने जास्तीत जास्त शेतकºयांनी यात सहभागी व्हावे.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक