शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी धरणातून हवे 5 टीएमसी पाणी

By admin | Updated: November 24, 2014 23:53 IST

महापालिका हद्दीत नव्याने 34 गावांचा समावेश होत असल्याने तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार, पालिका हद्दीजवळील 5 किलोमीटर र्पयतच्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे.

पुणो :  महापालिका हद्दीत नव्याने 34 गावांचा समावेश होत असल्याने तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार,  पालिका हद्दीजवळील 5 किलोमीटर र्पयतच्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी पालिकेस सुमारे े22.5क् टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे  महापालिकेस मुळशी धरणातूनही अतिरिक्त 5 टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली आहे. 
याबाबतचे पत्र मंगळवारी, दि. 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. शहरास सध्या खडकवासला प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 14 टीएमसी पाणी घेण्यात येते. तर मागील वर्षी भामा-आसखेड धरणातून सव्वा दोन टीएमसी पाणी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे.
गेल्या दशकभरात शहराचा विस्तार झाला आहे. 1997र्पयत महापालिकेस शहरासाठी साडेसात टीएमसी पाणी देण्यात येत होते. त्यानंतर 2क्क्क्मध्ये पालिकेत 23 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर हा पाणीकोटा वाढवून 9.5क् टीएमसी करण्यात आला. तर 2क्11मध्ये तो वाढवून 11.5क् टीएमसी करण्यात आला.
मात्र, त्या नंतर पाटबंधारे विभाग आणि महापालिकेत कोणताही पाणी वाटपाचा करार झालेला नाही. शहराची तहान भागविण्यासाठी पालिकेकडून दरमहा सव्वादोन टीएमसी प्रमाणो खडकवासला प्रकल्पातून 14 ते 15 टीएमसी पाणी घेतले जाते. मात्र, याच पाण्यातून पालिकेस हद्दीजवळील 5 किलोमीटरच्या परिसरातील गावांनाही पाणी पुरवावे लागते. (प्रतिनिधी)
 
1 हद्दीजवळील 34 गावे महापालिकेस समाविष्ट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही गावे आल्यास पाण्याची गरज वाढणार  आहे. शिवाय या गावांच्या पुढे 5 किलोमीटर्पयत पालिकेस पाणी पुरवावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेस प्रतिवर्षी 21 ते 22 टीएमसी पाण्याची गरज आहे. 
 
2 हे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेने या पूर्वीच खडकवासला प्रकल्पातून 16.5क् टीएमसी, भामा-आसखेड धरणातून सव्वा दोन टीएमसी पाण्याची मागणी केलेली आहे. त्यातील भामा-आसखेडच्या पाण्यासाठी मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळे अधिक पाण्यासाठी मुळशी धरणातील 5 टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. 
 
प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार
4शहराला जादा पाणी मिळण्याबरोबरच, मेट्रोला मान्यतेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात यावा, भामा-आसखेड योजानेसाठी शासनाने मागितलेला सिंचन पुनस्र्थापना खर्च माफ करावा, पावसाळी गटार योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, घनकचरा प्रकल्पासाठी मोशी, पिंपरी-सांडस येथील जागा तत्काळ ताब्यात मिळावी, उरुळी देवाची येथील कचरा डेपोग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळावा, आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मदत मिळावी, एलबीटी वरील मुद्रांक शुल्काचा अधिभार तत्काळ मिळावा, जेएनएनयूआरएम योजनेचा थकित निधी, बीआरटीच्या आयटीएमएस प्रकल्पाचा निधी,  घरकुल प्रकल्पाचा निधी, राज्य शासनाकडे थकित असलेली विविध 376 कोटी रूपयांची देणी, रिंगरोड प्रकल्प, पीएमपी जागांसाठी जादा एफएसआय देणो असे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाले.