शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

बालगृहात ५ मुली परतल्या

By admin | Updated: July 6, 2016 03:11 IST

येथील वरिष्ठ मुलींच्या बालगृहात आज २८ पैकी पाच मुली परतल्या. दोन दिवसांत इतर मुलीही येतील, असे बालगृहातील सूत्रांनी सांगितले. निधी, पाणी व वीजअभावी मुलींना आणले नाही.

शिरूर : येथील वरिष्ठ मुलींच्या बालगृहात आज २८ पैकी पाच मुली परतल्या. दोन दिवसांत इतर मुलीही येतील, असे बालगृहातील सूत्रांनी सांगितले. निधी, पाणी व वीजअभावी मुलींना आणले नाही. तसेच आता हे बालगृह अनाथ मुलींसाठी असणार आहे, असे विसंगत वक्तव्य करणाऱ्या या बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या विधानाला दिवस उलटला नाही तोच ‘लोकमत’च्या बातमीमुळे मुलींना आश्रय मिळू लागल्याचे चित्र आहे. बालगृहातील २८ मुली उन्हाळ्याच्या सुटीत घरी गेल्या. काही पुणे येथे गेल्या. सुटी संपली, १४ जूनला शाळा सुरू झाली. मात्र, तरीही मुली बालगृहात परतल्या नसल्याचे निदर्शनास आल्यावर बालगृहातील काळजीवाहक व लिपिकास याबाबत विचारणा केली असता, त्यांनी विसंगत उत्तर दिले होते. यामुळे मुलींच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. यावर माहिती घेतली असता, पाच मुली बालगृहात परतल्याचे सांगण्यात आले. निवासी अधीक्षिका एस. व्ही. भोरकर या रजेवर असल्याने निकम यांच्याकडे पदभार आहे. बालगृहाचा लॅन्डलाईन दूरध्वनी बंद आहे. तर, निकम यांनी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिव नम्रता गवारी यांना भ्रमणध्वनी क्रमांक देण्यास नकार दिला. मात्र, ५ मुली परतल्याचे सांगितले. (वार्ताहर)