शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी ५ कोटी

By admin | Updated: March 18, 2015 22:56 IST

स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेल्या दीड वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे़

राजगुरुनगर : आश्वासनानुसार हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेल्या दीड वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे़ अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राजगुरुनगरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हुतात्मा राजगुरूप्रेमी संघटनांनीही समाधान व्यक्त केले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म ज्या राजगुरुवाड्यात झाला त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानने १९८०च्या दशकात केली होती. तिला फलस्वरूप १९९५मध्ये मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी येथे कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हा वाडा राष्ट्रीय स्मारक करीत असल्याची घोषणा केली. त्याबाबत शासकीय आदेश २००४मध्ये निघाला व वाडा राष्ट्रीय स्मारक झाले. पुढे त्याचे प्रत्यक्ष स्मारक उभे राहण्यात अनेक अडचणी येत राहिल्या. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे राजगुरुनगरला २००६मध्ये आले असताना त्यांनी दीड कोटी रुपये निधी स्मारकासाठी दिल्याची घोषणा केली. वाड्याचे संपादन, आराखडा आणि पुढे मान्यता-मंजुरी इत्यादी सर्व प्रक्रिया २००७मध्ये पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामाला २००८मध्ये सुरुवात झाली.भारतीय पुरातत्त्व विभाग हे काम ठेकेदाराकरवी करीत होता. पुढे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल आंदोलन झाले. तसेच, आनंद गावडे यांनी यात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर ते बंद पडून अर्धवट राहिले. ठेकेदार न मिळणे, असलेल्या ठेकेदाराचा धरसोडपणा आणि निधीची अनुपलब्धता यांमुळे गेल्या दोन वर्षांपासून काम अतिशय संथ गतीने होत आहे. गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीदिनी २४ आॅगस्ट रोजी वाड्याला भेट देऊन काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देऊन कामाला गती देण्याचे आणि भीमा नदीवर पूल करण्याचे आश्वासन दिले होते. सत्ताबदलानंतर आमदार सुरेश गोरे आणि भाजपाचे नेते शरद बुट्टे-पाटील यांनी जोरदार पाठपुरावा केला. नागपूरच्या अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी देण्याचे लेखी आश्वासन बुट्टे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळला दिले होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे दिवंगत खासदार बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी जानेवारी महिन्यात राजगुरुनगरला आले होते़, तेव्हा त्यांनी स्मारकाचा सुधारित आराखडा करून दर्जेदार स्मारक करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, निधी कमी पडू देणार नाही, असेही आश्वासन दिले होते. बापट यांनी अर्थमंत्र्यांना पत्र देऊन ५ कोटी रुपये निधीची मागणीही केली होती. त्यानुसार या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी निधीची तरतूद केल्याने सर्व जण आनंदित झाले आहेत. (वार्ताहर)वाड्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा ४हुतात्मा राजगुरूंच्या जन्मखोलीचे काम पूर्ण झाले असून, सध्या देवघराचे काम सुरु आहे. तसेच भीमा नदीच्या बाजूने संरक्षक भिंत अर्धवट झाली आहे.४स्मारकामध्ये वाचनालय, संग्रहालय, हुतात्म्यांचा पुतळा इत्यादी अनेक गोष्टी प्रस्तावित आहेत. वाड्याला जोडणारा पूल भीमा नदीवर प्रस्तावित आहे. ४एकूण ४८ कोटींचा आराखडा आहे. या वाड्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा आणि त्यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी व्हावी, अशीही मागणी आहे. ४राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना स्थापन झाल्या. त्यांनी वेळोवेळी ही मागणी लावून धरली. हुतात्मा राजगुरू क्रांती संघाच्या वतीने आनंद गावडे यांनी ५ वेळा यासाठी हुतात्मा राजगुरू जयंती व पुण्यतिथीला उपोषण केले होते. तसेच, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीही अलीकडे याबाबत पाठपुरावा करीत होती.