शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बारावीच्या निकालाचे ४७ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीनंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीनंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार केला जात असून गेल्या तीन दिवसांतच निकालाचे ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात पुणे विभाग आघाडीवर असून विभागाचे निकालाचे ५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दहावीपेक्षा बारावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बारावीचा निकाल दहावी-अकरावीचे गुण आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. राज्य शासन व राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे काम सुरू केले आहे. दहावीचा निकाल तयार करताना आलेल्या अडचणी बारावीच्या निकालादरम्यान येऊ नये, या उद्देशाने राज्य मंडळाने काळजी घेतली आहे. त्यामुळे निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. येत्या ३१ जुलैपूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार १६ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे काम सुरू केले असून येत्या २३ जुलैपर्यंत राज्य मंडळाकडे अंतर्गत गुण भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सर्वच विभागातील शाळांनी अंतर्गत गुण भरण्याचे काम सुरू केले असले तरी पुणे जिल्ह्याने त्यात आघाडी घेतली आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पडणा-या पावसामुळे मुंबईचे काम काहीसे मागे पडले आहे. मात्र, उर्वरित दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मंडळाच्या अधिका-यांकडून व्यक्त केला जात आहे.

राज्यातील सुमारे ९७ टक्के कनिष्ठ महाविद्यालये शाळांना जोडून आहेत. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना बारावीचा निकाल तयार करण्यासाठी फार अडचणी येणार नाहीत. त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील १५ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांनी सबमिट करण्यात आली असून ४८ हजार विद्यार्थ्यांची माहिती भरून झाली आहे. मात्र, ती समबिट केली नाही. सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांचे गुण भरण्याचे काम अपूर्ण आहे, असे सूत्रांनी सांगितले.

----------------------------------------

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांकडून बारावीचा निकाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागाने निकालाचे ५३ टक्के पूर्ण केले. इतर विभागांच्या तुलनेत पुणे विभाग आघाडीवर आहे. दहावीच्या तुलनेत बारावीच्या निकालाचे काम लवकर पूर्ण होईल.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

-----------------

राज्य मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवले आहेत. तसेच गुण भरण्यासाठी एक्सेल शीट पाठवली आहे. अकरावी व बारावीचे गुण कनिष्ठ महाविद्यालयांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे निकाल तयार करण्यास गती मिळाली आहे.

-------------------------