शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

जिल्हा परिषदेच्या ४३0 शाळा ‘बोलक्या’

By admin | Updated: April 29, 2015 23:03 IST

गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात सुरू केलेल्या आयएसओ मानांकन उपक्रमला ग्रामपंचायती, शाळा व अंगणवाड्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आजअखेर ७९५ संस्था आयएसओ करण्यात यश आले आहे.

पुणे : गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात सुरू केलेल्या आयएसओ मानांकन उपक्रमला ग्रामपंचायती, शाळा व अंगणवाड्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आजअखेर ७९५ संस्था आयएसओ करण्यात यश आले आहे. यात ४३0 शाळा या ‘बोलक्या’ झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. ८८१ संस्था या प्रोसेसमध्ये असून त्यांनाही लवकरच मानांकन मिळणार आहे.यात २0२ ग्रामपंचायती, १६३ आंगणवाड्या तसेच ४३0 शाळांचा समावेश आहे. आमची सेवा, गुणवत्ता व दर्जा हा आंतरराष्ट्रीय असला पाहिजे, हा ध्यास घेऊन कांतिलाल उमाप यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेने ‘आयएसओ’ ही संकल्पना जिल्ह्यात गेल्या वर्षापासून राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषदेतील शाळांमधील घटती पटसंख्या हा एक चिंतेचा विषय होता. हे रोखणे हे प्रशासनासमोरचे मोठे अव्हान होते. यातून शाळा आयएसओ ही संकल्पना पुढे आली आणि शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या प्रयत्नातून वाबळेवाडीच्या शाळेने आयएसओचा पहिला मान मिळविला. आजअखेर जिल्ह्यातील ३ हजार ७४८ शाळांपैकी ४३० शाळा या आयएसओ झाल्या आहेत. यात बारामती, दौंड, जुन्नर, शिरूर व आंबेगाव हे तालुके आघाडीवर आहेत.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुका मात्र सर्वांत मागे असून, फक्त २ शाळा आयएसओ झाल्या आहेत. दौंड तालुक्यातील वरवंड केंद्राने सर्वांत आघाडी घेतली असून, १७ पैैकी १७ शाळा या आयएसओ केल्या आहेत. तसेच, त्यांच्या केंद्रप्रमुखांचे कार्यालयही आयएसओ झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले, की या उपकक्रमामुळे शाळांमधील भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेत आमूलाग्र बदल होत असून, मी माझ्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवणार, अशी पालकांची मानसिकता करण्यात आम्हाला यश येत आहे. पालकांनीही आता आग्रही न राहता मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवावे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी) तालुका ग्रामपंचायती शाळा अंगणवाड्या एकूणआंबेगाव ४२४२ ४१ १२५बारामती ८६५१०८३ भोर ०२00२0दौंड ०६५१६६हवेली २२१७१४०इंदापूर ०२०२जुन्नर ५४६२७०१८६खेड १७४५८७०मावळ ६४६१६मुळशी १३२०२४५७पुरंदर ५३१०३६शिरूर ३५५०२८७वेल्हा ०७०७एकूण२०२४३०१६३७९५आयएसओ ही एक चळवळ असून, जिल्हा परिषदेतील पहिलीच्या मुलाला १०० पर्यंत उजळणी, १० पर्यंत पाढे व घडाघडा वाचता आलेच पाहिजे. याचबरोबर, अंगणवाड्यांप्रमाणे बोलक्या शाळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - कांतिलाल उमापमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदआयएसओमुळे शाळा ‘अटडेट’ झाली आहे. रेकॉर्ड अद्ययावत झाले असून गुणवत्ता वाढली आहे. शाळेतील भौतिक सुविधांमध्येही वाढ झाली असून शिक्षकांना काम करताना आनंद वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे उपक्रम राबविले जात असून आनंददायी शिक्षण आता मिळत आहे. यात पालकांचा चांगला सहभाग मिळत आहे.- दत्तात्रय कंकशिक्षक, आयएसओ शाळा शिंद(भोर)