शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

बारा वर्षांत ४२ हजार शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 04:51 IST

पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात गेल्या १२ वर्षांत ४२ हजार ४८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

विशाल शिर्के ।पुणे : पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात गेल्या १२ वर्षांत ४२ हजार ४८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशभरात १ लाख ७१ हजार ८०५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. देशात राज्यातील या आत्महत्यांचे प्रमाण २८ टक्के आहे.पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळविलेल्या माहितीतून हे विदारक वास्तव समोर आले आहे. २०१६चा शेतकरी आत्महत्यांचा अहवाल अद्याप प्रसिद्ध झाला नसल्याने, त्या वर्षाची आकडेवारी यात समाविष्ट नाही.देशांत महाराष्ट्रासारख्या प्रगत प्रदेशातच सातत्याने सर्वाधिक आत्महत्येची नोंद होत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकातील (१४ टक्के) आणि आंध्र प्रदेशातील (१२.३४ टक्के) शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, केरळसारखे १०० टक्के साक्षर राज्यदेखील या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशात २४ हजार ७२ आणि कर्नाटकात २१ हजार २०१ आत्महत्यांची नोंद झाली आहे.मध्य प्रदेशात शेतकरी आत्महत्येचा आकडा १४ हजार ५३० इतका आहे. उत्तर प्रदेशात ६ हजार २१२, गुजरातेत ५ हजार ४०५, राजस्थान ५ हजार ९३, ओडिसात बावीसशे आणि बिहारमध्ये ७४६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. ईशान्येकडील राज्यांपैकी आसाममध्ये सर्वाधिक ३ हजार २०३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.>आत्महत्याग्रस्त राज्यांची आकडेवारीराज्य २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५महाराष्ट्र ३,३३७ ३,७८६ ३,१४६ २,५६८ ३०३०कर्नाटक २,१०० १,८७५ १,४०३ ३,२१ १,१९७आंध्र प्रदेश २,२०६ २,५७२ २,०१४ १६० ५१६मध्य प्रदेश १,३२६ १,१७२ १,०९० ८२६ ५८१