शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षांत ४२ हजार शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 04:51 IST

पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात गेल्या १२ वर्षांत ४२ हजार ४८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

विशाल शिर्के ।पुणे : पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात गेल्या १२ वर्षांत ४२ हजार ४८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशभरात १ लाख ७१ हजार ८०५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. देशात राज्यातील या आत्महत्यांचे प्रमाण २८ टक्के आहे.पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळविलेल्या माहितीतून हे विदारक वास्तव समोर आले आहे. २०१६चा शेतकरी आत्महत्यांचा अहवाल अद्याप प्रसिद्ध झाला नसल्याने, त्या वर्षाची आकडेवारी यात समाविष्ट नाही.देशांत महाराष्ट्रासारख्या प्रगत प्रदेशातच सातत्याने सर्वाधिक आत्महत्येची नोंद होत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकातील (१४ टक्के) आणि आंध्र प्रदेशातील (१२.३४ टक्के) शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, केरळसारखे १०० टक्के साक्षर राज्यदेखील या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशात २४ हजार ७२ आणि कर्नाटकात २१ हजार २०१ आत्महत्यांची नोंद झाली आहे.मध्य प्रदेशात शेतकरी आत्महत्येचा आकडा १४ हजार ५३० इतका आहे. उत्तर प्रदेशात ६ हजार २१२, गुजरातेत ५ हजार ४०५, राजस्थान ५ हजार ९३, ओडिसात बावीसशे आणि बिहारमध्ये ७४६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. ईशान्येकडील राज्यांपैकी आसाममध्ये सर्वाधिक ३ हजार २०३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.>आत्महत्याग्रस्त राज्यांची आकडेवारीराज्य २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५महाराष्ट्र ३,३३७ ३,७८६ ३,१४६ २,५६८ ३०३०कर्नाटक २,१०० १,८७५ १,४०३ ३,२१ १,१९७आंध्र प्रदेश २,२०६ २,५७२ २,०१४ १६० ५१६मध्य प्रदेश १,३२६ १,१७२ १,०९० ८२६ ५८१