शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

बारावीचे ४१४ विद्यार्थी ‘अन् रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या ३१ ...

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील ४१४ विद्यार्थ्यांशी संपर्कच होऊ न शकल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. तसेच दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही सर्व विक्रम मोडीत काढणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. निकाल तयार करण्यासाठी इयत्ता दहावी, अकरावीच्या आणि बारावीच्या अंतर्गत गुणांचा आधार घेतला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधला. अंतर्गत गुण देण्यासाठी काही महाविद्यालयांकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, वर्षभर महाविद्यालयाशी कोणताही संपर्क साधला नाही, अशा विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता आला नाही.

राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी राज्यातील १३ लाख १७ हजार ७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण संकलित करून राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरले. त्यामुळे निकाल तयार करण्यचे काम अंमित टप्प्यात आहे. येत्या ३१ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न आहे.

कोरोनामुळे झालेले स्थलांतर, बदलेला मोबाईल क्रमांक आदी कारणांमुळे राज्यातील ४१४ विद्यार्थ्यांपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांना पोहचता आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता आला नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

----------------