शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

धरणबांधणीत ४० ते ५० टक्के सिमेंटचा अपहार

By admin | Updated: August 20, 2016 05:10 IST

राज्यातील १३६ धरणांपैकी बहुतांश धरणे आवश्यकतेएवढी मजबूत नाहीत, असे एका समितीच्या अभ्यासात दिसून आले आहे. धरण बांधताना ४५ ते ५० टक्के सिमेंटचा अपहार झाला आहे.

पुणे : राज्यातील १३६ धरणांपैकी बहुतांश धरणे आवश्यकतेएवढी मजबूत नाहीत, असे एका समितीच्या अभ्यासात दिसून आले आहे. धरण बांधताना ४५ ते ५० टक्के सिमेंटचा अपहार झाला आहे. धरणांच्या सुरक्षेबाबत सरकारने नेमलेल्या चितळे समितीने धरणसुरक्षेबाबत ज्या निकषांचा आधार घेऊन अभ्यास केला तो जर आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी तपासला तर नक्कीच चितळे समितीची छी-थू होईल. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचार झाकण्यासाठीच माधवराव चितळे यांच्याकडून असा अहवाल तयार करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी पत्रकार परिषदेत केला. टेमघर धरणातून गळती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा, राजेश चौधरी, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.पांढरे म्हणाले, ‘‘टेमघरसह वरसगाव, पानशेत, पवना या धरणांवर झाडेझुडपे उगविली आहेत. यावरून कॉँक्रीटमध्ये मातीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये टेमघरच्या बाबत सरकारने नेमलेल्या रानडे समितीला अहवाल देण्यासाठी दोन वर्षे लागली. त्यानंतर सध्याच्या सरकारने लगेचच ९५ कोटींचे डागडुजीसाठीचे टेंडर काढण्याचे ठरवले हे संशयास्पद आहे.’’या वेळी प्रीती मेनन म्हणाल्या, ‘‘गिरीश महाजन यांनी श्रीनिवास एंटरप्रायजेस आणि प्रोग्रेसिव्ह एंटरप्रायजेस या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वास्तविक या कंपन्यांनी टेमघर धरणाचे काम केले असल्याचा उल्लेख त्यांच्या संकेतस्थळांवर आढळत नाही. धरणाचे बांधकाम सोमा एंटरप्रायजेस या कंपनीच्या नावे असल्याचा स्पष्ट उल्लेख कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. गुन्हा दाखल करताना जाणीवपूर्वक सोमा एंटरप्रायजेस कंपनीला वगळले आहे. कारण धरणबांधणीच्या वेळी कंपनीचे संचालक अविनाश भोसले होते. त्यांना या प्रकरणातून वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात आहे. या धरणांच्या दुरुस्तीसाठी जनतेचा पैसा न वापरता संबंधित कंत्राटदाराकडून खर्च वसूल करायला हवा.’’ (प्रतिनिधी)सर्व धरणांचे थर्ड पार्टी आॅडिट करावे सगळ्याच धरणांतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. टेमघर धरणाला बांधून फक्त १५ वर्षे झालेली आहेत. त्याचे बांधकाम करणाऱ्या सोमा कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे सोडून सरकार जनतेच्या पैशातून धरणाची डागडुजी करत आहे. या कंत्राटदाराला सरकार पाठीशी घालत आहे असे दिसते. महाराष्ट्रातील सर्व धरणांचे थर्ड पार्टी आॅडिट करावे. संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रीती मेनन यांनी केली.‘एबीआयएल’चा संबंध नाहीअविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लि. चे (एबीआयएल) व्यवस्थापकीय संचालक अमित भोसले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, टेमघर धरणाच्या बांधणीचे कंत्राट श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना दिले होते. त्यांच्याशी एबीआयएलचा काहीही संबंध नाही. त्या काळात एबीआयएल पायाभूत सुविधांच्या व्यवसायात नव्हते.