शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

भीमा नदीकाठच्या कृषिपंपांना ४ तास वीज

By admin | Updated: April 11, 2016 00:46 IST

दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना भामा आसखेडचे पाणी पोहचण्यासाठी शिरूर-हवेलीतील विद्युत पंपांची वीज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आली होती.

कोरेगाव भीमा : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना भामा आसखेडचे पाणी पोहचण्यासाठी शिरूर-हवेलीतील विद्युत पंपांची वीज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आली होती. मात्र शिरूर-हवेलीतील पिके जळू लागल्याने दररोज चार तास वीज सुरू करण्याची मागणी केल्यानंतर सोमवारपासून (दि. ११) पासून चार तास वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, असे आमदार पाचर्णे यांनी सांगितले. या निर्णयामुळे भीमा नदीकाठचा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दौंड तालुक्यतील पिके जळू लागल्याने भामा-आसखेडचे भीमा नदीपात्रात २८ मार्चपासून ९०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी शिरूर-हवेली तालुक्याच्या पुढे गेलेच नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी भीमा नदीकाठच्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश १ एप्रिल रोजी दिल्यानंतरही वीजपुरवठा चालूच होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने विद्युत पंपांची वीज बंद केली. मात्र, वीज बंद करण्याच्या काही तासांतच पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा, शेरीवस्ती व हवेली तालुक्यातील पेरणे, वढू खुर्द, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस याठिकाणचे विद्युत पंप शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी सुरू असल्याने हा वीजपुरवठा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरू असल्याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही महावितरण केराची टोपलीच दाखवीत आहे. (वार्ताहर)

शेतीपंपांना आठ तास वीज देण्याची मागणीइंदापूर : उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन तासांवर आणलेला वीजपुरवठा आठ तास करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटी व उजनी धरणग्रस्त संवर्धन समितीच्या वतीने रविवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगराई येथील बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दौंड तालुक्यातील सोनवडी बंधाऱ्यापर्यंत पाणी गेले असून, भीमा नदीपात्रात बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे व वाळूच्या ढिगाऱ्यांमुळे पाणी पोहोचण्यास विलंब होत आहे. खोरवडी, देऊळगावराजे, पेडगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी तीन-चार दिवसांत पोहोचेल, तरी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.- ए. डी. संकपाळ, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग