शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

भीमा नदीकाठच्या कृषिपंपांना ४ तास वीज

By admin | Updated: April 11, 2016 00:46 IST

दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना भामा आसखेडचे पाणी पोहचण्यासाठी शिरूर-हवेलीतील विद्युत पंपांची वीज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आली होती.

कोरेगाव भीमा : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना भामा आसखेडचे पाणी पोहचण्यासाठी शिरूर-हवेलीतील विद्युत पंपांची वीज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आली होती. मात्र शिरूर-हवेलीतील पिके जळू लागल्याने दररोज चार तास वीज सुरू करण्याची मागणी केल्यानंतर सोमवारपासून (दि. ११) पासून चार तास वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, असे आमदार पाचर्णे यांनी सांगितले. या निर्णयामुळे भीमा नदीकाठचा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दौंड तालुक्यतील पिके जळू लागल्याने भामा-आसखेडचे भीमा नदीपात्रात २८ मार्चपासून ९०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी शिरूर-हवेली तालुक्याच्या पुढे गेलेच नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी भीमा नदीकाठच्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश १ एप्रिल रोजी दिल्यानंतरही वीजपुरवठा चालूच होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने विद्युत पंपांची वीज बंद केली. मात्र, वीज बंद करण्याच्या काही तासांतच पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा, शेरीवस्ती व हवेली तालुक्यातील पेरणे, वढू खुर्द, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस याठिकाणचे विद्युत पंप शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी सुरू असल्याने हा वीजपुरवठा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरू असल्याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही महावितरण केराची टोपलीच दाखवीत आहे. (वार्ताहर)

शेतीपंपांना आठ तास वीज देण्याची मागणीइंदापूर : उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन तासांवर आणलेला वीजपुरवठा आठ तास करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटी व उजनी धरणग्रस्त संवर्धन समितीच्या वतीने रविवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगराई येथील बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दौंड तालुक्यातील सोनवडी बंधाऱ्यापर्यंत पाणी गेले असून, भीमा नदीपात्रात बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे व वाळूच्या ढिगाऱ्यांमुळे पाणी पोहोचण्यास विलंब होत आहे. खोरवडी, देऊळगावराजे, पेडगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी तीन-चार दिवसांत पोहोचेल, तरी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.- ए. डी. संकपाळ, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग