शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

तौक्ते चक्रीवादळामुळे ३६ कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून भोर, वेल्हा तालुक्यात वादळी वारे जोरदार वाहू लागल्याने नसरापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नसरापूर : तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून भोर, वेल्हा तालुक्यात वादळी वारे जोरदार वाहू लागल्याने नसरापूर व निधान येथील ३६ आदिवासी कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

वाऱ्यासह पाऊस येण्याच्या शक्यतेने भोर तालुक्यातील नसरापूरसह निधान येथील ३६ आदिवासी कातकरी कुटुंबातील ११० नागरिकांचे राहत्या कच्च्या घरातील वस्तीतून स्थलांतर, नसरापूर येथील ३२ कुटुंबांचे श्री शिवाजी विद्यालयात, तर निधान येथील ४ कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी करण्यात आले.

रविवारी दुपारपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळलीतील अशी स्थिती आहे. या वाऱ्यामुळे मोठे नुकसान झालेले नाही, तरीही नसरापूर येथील मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली व तलाठी जालिंदर बरकडे यांनी त्यांना सुरक्षित ठिकाण हलविण्याचे दुपारपासून आवाहन केले होते. काही दिवसांपूर्वी येथील कातकरी वस्तीतील दोन छोट्या मुलींच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्या धास्तीने कुटुंबांनी स्थलांतरासाठी प्रशासनाच्या आवाहनाला लगेच प्रतिसाद दिला. या कुटुंबांना जोपर्यंत ही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास रहाणार आहेत तोपर्यंत त्यांच्या भोजनाची व्यवस्था नसरापूर ग्रामपंचायतीने केली आहे.

फोटो व ओळ : नसरापूर (ता.भोर) येथील आदिवासी कातकरी कुटुंबांचे प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.