शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

आपसी बदलीतून आलेले ‘ते’ ३५ शिक्षक पेचात!

By admin | Updated: November 16, 2016 03:01 IST

आपसी बदलीतून या वर्षी पुणे जिल्ह्यात आलेल्या ३५ शिक्षकांना वारंवार नोटिसा देऊनही दिलेल्या शाळांवर रूजू न झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण

बापू बैलकर / पुणेआपसी बदलीतून या वर्षी पुणे जिल्ह्यात आलेल्या ३५ शिक्षकांना वारंवार नोटिसा देऊनही दिलेल्या शाळांवर रूजू न झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभाग परत त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ते शिक्षक पेचात अडकले आहेत. त्यात विशेष म्हणजे, महिला शिक्षकांची मोठी अडचण झाली आहे. आता या शिक्षकांनी १ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी असे केले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. त्यामुळे ते ना धड तिकडचे, ना इकडचे, अशी अवस्था झाल्याच्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केली.दहा-वीस वर्षे दुसऱ्या जिल्ह्यात सेवा केल्यानंतर ४२ शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात सेवा करण्याची संधी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिली. या वेळी आपल्या जिल्ह्यात जातोय या आनंदापोठी त्या शिक्षकांनी संमतिपत्रावर लिहून देऊन जी शाळा मिळेल तेथे काम करण्याच्या अटीवर ते आले. मात्र, यापूर्वी झालेल्या अंशत: बदलाच्या आशेवर आपल्यालाही अंशत: बदल करून मिळेल म्हणून त्यांनी पदभारच घेतला नाही. वारंवार त्यांना कळवूनही त्यांनी पदभार न घेतल्याने शिक्षण विभागाने अखेर त्यांना नोटीस पाठविली. त्यानंतर त्यातील ७ शिक्षक हजर झाले; मात्र ३५ शिक्षक हजर झाले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्यांना अखेरची नोटीस पाठवली आहे. यात ‘आपणास दिलेल्या शाळेवर आपण ७ दिवसांच्या आत जर हजर झाला नाहीत, तर झालेला आदेश रद्द करून आपणास पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू करून घेणार नाही व मूळ जिल्ह्यात परत पाठविण्यात येईल. ही नोटीस २९ आॅक्टोबर रोजी पाठविण्यात आली असून, त्याची मुदत संपली तरी ते शिक्षक रुजू झाले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभाग त्यांना परत पाठविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, ‘‘शाळा स्वीकारण्यापूर्वी त्या पाहायाला हव्या होत्या. ‘आम्ही देईल त्या शाळेवर जाण्यास तयार आहोत,’ असे संमतिपत्रही त्यांनी दिले आहे. मात्र, ते अद्याप रुजू झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. हे शिक्षक जर उपोषणाला बसले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच, शासकीय कामात अडथळा आणला म्हणून फौजदारीही होऊ शकते. अशंता बदलामुळे दुर्गम शाळांवर शिक्षकच मिळत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने ते न करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.