शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

अवकाळीमुळे ३३ टक्के द्राक्ष बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:15 IST

अवकाळी पावसाने सध्याचा बाजारभावाचा विचार करता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ...

अवकाळी पावसाने सध्याचा बाजारभावाचा विचार करता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. नारायणगाव, गुंजाळवाडी, वारूळवाडी ,येडगाव, खोडद, मांजरवाडी हा परिसर जुन्नर तालुक्यातील द्राक्ष पट्टा म्हणून ओळखला जातो. १७ गावात ७ जानेवारीला सायंकाळी ६.३० नंतर मुसळधार अवकाळी पाऊस झाला. परिणामी १२ तास द्राक्ष घडात पाणी राहिल्याने द्राक्ष घडातील मण्यांना देठाकडील बाजुने चिरा पडल्या. त्याने निर्यातक्षम द्राक्ष मातीमोल झाली. कृषी अधिकारी प्रमोद बनकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दि.८ जानेवारी रोजी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार यांनी नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. या १७ गावांतील १०८६ एकर क्षेत्रातील परिपक्व अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. गुंजाळवाडी नारायणगाव १२५ हेक्टर, वारुळवाडी ६३ हेक्टर, येडगाव ४३ हेक्टर, पिंपळगाव तर्फे नारायणगाव ३१ हेक्टर या गावातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. २५ ऑक्टोबरनंतर छाटणी झालेल्या थिनिंग सुरू असलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान नुकसान कमी झाल्याने त्या बागांचे पंचनामे केले नाहीत. औषधांची फवारणी करून या बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक प्रयत्न करत आहेत. द्राक्ष घडाभोवती लावलेले संरक्षक कागद पावसाने भिजल्याने दुबार कागद लावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. औषधांची फवारणी खर्चात एकरी सुमारे ४० हजार रुपयांची वाढ होणार आहे.

.****चौकटीसाठी मजकुर--

द्राक्षबागेला एकरी भांडवली सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च होतो. नुकसान झालेल्या १०८६ एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे सुमारे ३८ कोटी रुपयांचा खर्च अंगावर आला आहे. या निर्यातक्षम द्राक्षाचे १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो दराने करार केले होते. परिणामी शेतकऱ्यांचे १०० ते १३५ कोटींचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची हेक्टरी १८ हजार रुपये दराने शासकीय नियमानुसार भरपाई मिळेल. नुकसान व भरपाई यात मोठी तफावत आहे.