शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

३०८ अंगणवाडी केंद्रांमध्ये वीज, पाणी देण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:33 IST

ग्रामीण भागातील अंगणवाड्या स्वयंपूर्ण : शहरातील अंगणवाडी अद्याप दुर्लक्षितच

बारामती : बारामतीच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्र वीज आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असताना शहरातील अंगणवाड्या मात्र अद्याप दुर्लक्षितच आहेत. तालुक्यातील ३२३ स्वतंत्र इमारतींपैकी ३०८ इमारतींना वीजजोड व नळजोड देण्यात प्रशासनास यश आले आहे. बारामती तालुक्यात ४१७ अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी प्रकल्प एकमध्ये २५३ तर प्रकल्प दोनमध्ये १६४ केंद्रांचा समावेश होतो.

प्रकल्प एकमध्ये १८८ अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. यामधील १८२ अंगणवाडी केंद्रे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. तर प्रकल्प दोन मध्ये १३५ अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. यामधील १२६ अंगणवाडी केंद्रांना वीज देण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर प्रकल्प एकमधील १८८ अंगणवाडी केंद्र व प्रकल्प दोन मधील १२४ अंगणवाडी केंद्रांना नळजोड देण्यात आले आहेत. विजेच्या खांबाअभावी १५ अंगणवाडी केंद्रांना वीज देण्यात अडचण येत आहे. तर ५ अंगणवाडी केंद्राच्या वीज व नळजोडची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र हद्दवाडीनंतर बारामती नगरपालिकेच्या हद्दीत एकूण २२ अंगणवाड्या आल्या आहेत. यापैकी प्रकल्प एकमध्ये माळेगाव, सातववस्ती, बोरावकेवस्ती, ढवाणवस्ती, तर प्रकल्प दोनमध्ये जळोची गावठाण, औद्योगिक वसाहत, मलगुंडेवस्ती, सूर्यनगरी आदी अंगणवाडी केंद्रांना तात्पुरत्या इमारतींची सोय आहे. मात्र शहरातील या अंगणवाड्यांमध्ये सोयी पुरवताना बालविकास प्रकल्प विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे शहराच्या दृष्टीने अविकसित असणाऱ्या ग्रामीण भागातील अंगणवाडी वीज आणि पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण होत असताना बारामती नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे २२ अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. शहरातील सर्वसामान्यांची हजारो बालके या अंगणवाड्यांमधून शिक्षणाची सुरुवात करत आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती करूनदेखील शहर हद्दीतील अंगणवाडी केंद्रांची दखल घेतली जात नाही.च्बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दुष्काळाचा परिणाम अंगणवाडी केंद्रावर देखील झाला आहे. गाडीखेल, साबळेवाडी, भिलारवाडी, सोनवडी सुपे काळेवाडी, कारखेल आदी गावांमध्ये पाणी योजनाच नसल्याने येथील अंगणवाडी केंद्रांना नळजोड देण्यात आले नसल्याचे, बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने सांगण्यात आले.तालुक्यातील स्वतंत्र इमारती असणाºया अंगणवाडी केंद्रांना वीज व नळजोड देण्यात यश आले आहे. काही ठिकाणी किरकोळ अडचणींमुळे वीज व पाणी देण्यात अडचणी आल्या आहेत. मात्र शहरात या सर्व सोयी अंणवाडी केंद्रांना देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा.- मिथुनकुमार नागमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारीबारामती पंचायत समिती

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती