शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शालेय वाहतूक करणारी 30 वाहने जप्त

By admin | Updated: July 5, 2016 17:32 IST

विद्यार्थी शालेय वाहतूकीसाठी आवश्यक असलेले परवाने तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र न घेतलेली तब्बल 30 वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात जप्त केली.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५  : विद्यार्थी शालेय वाहतूकीसाठी आवश्यक असलेले परवाने तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र न घेतलेली तब्बल 30 वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात जप्त केली. त्यात प्रामुख्याने व्हँन तसेच आॅटोरिक्षांचा समावेश आहे. या वाहन तपासणीसाठी शहरात 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी सहा ते दुपारी 12 वाजे पर्यंत ही वाहन तपासणी करण्यात आली असून या पुढेही अशा प्रकारची कारवाई नियमितपणे करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. शहरात शालेय वाहतूकीसाठी सुमारे 3 हजार वाहनांची नोंदणी आहे. त्यात जवळपास दोन हजारहून अधिक व्हँन तर इतर स्कूल बसेस आहेत.

या वाहनांची तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी व्हावी या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 15 जुलै पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतरही अनेक वाहनांनी आवश्यक त्या तपासण्या तसेच कादपत्रांची पूर्तता केली नसल्याने 30 जून पर्यंत विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अनेक वाहने विना परवाना तसेच तपासण्या न करताच शालेय मुलांची वाहतूक करत होते तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याचे समोर येत होते. त्यामुळे आज ही धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात सुमारे 368 वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी जवळपास 140 वाहनांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. तर 30 वाहने परवाना नसतानाही वाहतूक करत असल्याचे समोर आले. त्यामुळे अशी सर्व वाहने जप्त करण़्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

शाळांची उदासिनता...

या कारवाई वरून वाहन मालकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ही वाहतूक करण़्यासाठी वाहनचालकांना आवश्यक असलेला परवाना घेण्यासाठी शाळा तसेच वाहन मालका मध्ये सामंजस्य करार असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांचे मुख्याध्यापक हा करार करत नाहीत. त्यामुळे विना परवाना वाहतूक करत असल्याची बाब चालक तसेच वाहन मालकांनी प्रादेशिक परिवहन अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, गेल्या तीन वर्षापासून पोलीस आयुक्त अध्यक्ष असलेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या माध्यमातून शहरातील शाळांच्या मुख्याध्यपकांच्या विशेष कार्याशाळा घेऊन त्यांना सामंजस्य करार करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत.

त्यानंतर शाळांकडून एखादी दुर्घटना घडल्यास अडचण येईल या भितीपोटी हा करार केला जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या कायद्यानेच शाळांना करारामुळे कारवाई होणार नसल्याचे अभय दिले असल्याने शाळांनी सामंजस्य करारासाठी पुढे यावे असे आवाहन राऊत यांनी केले आहे.