शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शालेय वाहतूक करणारी 30 वाहने जप्त

By admin | Updated: July 5, 2016 17:32 IST

विद्यार्थी शालेय वाहतूकीसाठी आवश्यक असलेले परवाने तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र न घेतलेली तब्बल 30 वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात जप्त केली.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५  : विद्यार्थी शालेय वाहतूकीसाठी आवश्यक असलेले परवाने तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र न घेतलेली तब्बल 30 वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात जप्त केली. त्यात प्रामुख्याने व्हँन तसेच आॅटोरिक्षांचा समावेश आहे. या वाहन तपासणीसाठी शहरात 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी सहा ते दुपारी 12 वाजे पर्यंत ही वाहन तपासणी करण्यात आली असून या पुढेही अशा प्रकारची कारवाई नियमितपणे करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. शहरात शालेय वाहतूकीसाठी सुमारे 3 हजार वाहनांची नोंदणी आहे. त्यात जवळपास दोन हजारहून अधिक व्हँन तर इतर स्कूल बसेस आहेत.

या वाहनांची तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी व्हावी या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 15 जुलै पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतरही अनेक वाहनांनी आवश्यक त्या तपासण्या तसेच कादपत्रांची पूर्तता केली नसल्याने 30 जून पर्यंत विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अनेक वाहने विना परवाना तसेच तपासण्या न करताच शालेय मुलांची वाहतूक करत होते तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याचे समोर येत होते. त्यामुळे आज ही धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात सुमारे 368 वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी जवळपास 140 वाहनांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. तर 30 वाहने परवाना नसतानाही वाहतूक करत असल्याचे समोर आले. त्यामुळे अशी सर्व वाहने जप्त करण़्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

शाळांची उदासिनता...

या कारवाई वरून वाहन मालकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ही वाहतूक करण़्यासाठी वाहनचालकांना आवश्यक असलेला परवाना घेण्यासाठी शाळा तसेच वाहन मालका मध्ये सामंजस्य करार असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांचे मुख्याध्यापक हा करार करत नाहीत. त्यामुळे विना परवाना वाहतूक करत असल्याची बाब चालक तसेच वाहन मालकांनी प्रादेशिक परिवहन अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, गेल्या तीन वर्षापासून पोलीस आयुक्त अध्यक्ष असलेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या माध्यमातून शहरातील शाळांच्या मुख्याध्यपकांच्या विशेष कार्याशाळा घेऊन त्यांना सामंजस्य करार करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत.

त्यानंतर शाळांकडून एखादी दुर्घटना घडल्यास अडचण येईल या भितीपोटी हा करार केला जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या कायद्यानेच शाळांना करारामुळे कारवाई होणार नसल्याचे अभय दिले असल्याने शाळांनी सामंजस्य करारासाठी पुढे यावे असे आवाहन राऊत यांनी केले आहे.