शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राज्यभरातून ३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:25 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून पाचवीच्या १६ हजार ५९३ तर आठवीच्या १३ हजार ७५९ अशा एकूण ३० हजार ३५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ५ वीचा निकाल २२.९७, तर ८ वीचा निकाल १२.५७ टक्के इतका लागला आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी २०१८ रोजी ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली होती. इयत्ता ५ वीमधून ४ लाख ८८ हजार ८५१ तर ८ वीमधून ३ लाख ७० हजार २४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५ वीमधून १ लाख ८ हजार ५६० विद्यार्थी तर ८ वीमधून ४५ हजार १०३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत, अशी माहिती महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता यादी, शाळांची जिल्हा व तालुकानिहाय सांख्यिकी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटआॅफ शेकडा गुणांइतके गुण मिळूनही निकषांची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर विहीत वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. गुणवत्तायादी तयार करताना रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आले आहेत, त्यानुसार गुणवत्तायादी तयार करण्यात आली आहे.तात्पुरता निकाल २१ जून २०१८ रोजी जाहीर करण्यात आला होता. २१ जून ते १० जुलै या कालावधीमध्ये गुणपडताळणीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शाळांना करण्यात आले होते. त्यानुसार शाळांकडून आलेल्या अर्जांची छाननी करून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे, असे सुखदेव डेरे यांनी स्पष्ट केले आहे.>१ सप्टेंबरपर्यंत मिळणार प्रमाणपत्रेशिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक/प्रमाणपत्र यांच्या छापील प्रती गटशिक्षणाधिकाºयांमार्फत सर्व शाळांना १ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महाराष्टÑराज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी