शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राज्यभरातून ३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:25 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून पाचवीच्या १६ हजार ५९३ तर आठवीच्या १३ हजार ७५९ अशा एकूण ३० हजार ३५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ५ वीचा निकाल २२.९७, तर ८ वीचा निकाल १२.५७ टक्के इतका लागला आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी २०१८ रोजी ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली होती. इयत्ता ५ वीमधून ४ लाख ८८ हजार ८५१ तर ८ वीमधून ३ लाख ७० हजार २४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५ वीमधून १ लाख ८ हजार ५६० विद्यार्थी तर ८ वीमधून ४५ हजार १०३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत, अशी माहिती महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता यादी, शाळांची जिल्हा व तालुकानिहाय सांख्यिकी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटआॅफ शेकडा गुणांइतके गुण मिळूनही निकषांची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर विहीत वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. गुणवत्तायादी तयार करताना रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आले आहेत, त्यानुसार गुणवत्तायादी तयार करण्यात आली आहे.तात्पुरता निकाल २१ जून २०१८ रोजी जाहीर करण्यात आला होता. २१ जून ते १० जुलै या कालावधीमध्ये गुणपडताळणीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शाळांना करण्यात आले होते. त्यानुसार शाळांकडून आलेल्या अर्जांची छाननी करून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे, असे सुखदेव डेरे यांनी स्पष्ट केले आहे.>१ सप्टेंबरपर्यंत मिळणार प्रमाणपत्रेशिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक/प्रमाणपत्र यांच्या छापील प्रती गटशिक्षणाधिकाºयांमार्फत सर्व शाळांना १ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महाराष्टÑराज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी