शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

प्रवेशापासून ३० हजार विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:27 IST

अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीअखेर ५१ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे तर अद्यापही ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

पुणे : अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीअखेर ५१ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे तर अद्यापही ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तिसरी फेरी संपल्यानंतरही मोठ्या संख्येने प्रवेश न मिळू शकल्याने विद्यार्थी व पालक धास्तावले आहेत. केंद्रीय प्रवेश समितीने या प्रक्रियेत योग्य तो हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली.चौथ्या फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे. आता केंद्रीय प्रवेशाच्या २९ हजार ५६० तर कोट्यांतर्गत १५ हजार ४४ अशा एकूण ४१ हजार ८०६ जागा रिक्त आहे. प्रवेश अर्जापेक्षा जागांची संख्या जास्त असली तरी विद्यार्थ्यांना सोयीचे महाविद्यालय मिळू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तिसºया फेरीमध्ये केवळ साडे हजार प्रवेश होऊ शकले. त्यामुळे आता चौथ्या फेरीत ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.रिक्त राहिलेल्या रिक्त जागांचा तपशील व महाविद्यालयांचे कटआॅफ वेळापत्रकानुसार बुधवारी जाहीर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते जाहीरच करण्यात आले नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे कटआॅफ उपलब्ध न झाल्याने गुरुवारी पसंतीक्रम भरण्यासाठी त्यांना अडचणीचा सामना करावा लागला.