शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

प्रवेशापासून ३० हजार विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:27 IST

अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीअखेर ५१ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे तर अद्यापही ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

पुणे : अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीअखेर ५१ हजार ३४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे तर अद्यापही ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तिसरी फेरी संपल्यानंतरही मोठ्या संख्येने प्रवेश न मिळू शकल्याने विद्यार्थी व पालक धास्तावले आहेत. केंद्रीय प्रवेश समितीने या प्रक्रियेत योग्य तो हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली.चौथ्या फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे. आता केंद्रीय प्रवेशाच्या २९ हजार ५६० तर कोट्यांतर्गत १५ हजार ४४ अशा एकूण ४१ हजार ८०६ जागा रिक्त आहे. प्रवेश अर्जापेक्षा जागांची संख्या जास्त असली तरी विद्यार्थ्यांना सोयीचे महाविद्यालय मिळू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तिसºया फेरीमध्ये केवळ साडे हजार प्रवेश होऊ शकले. त्यामुळे आता चौथ्या फेरीत ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.रिक्त राहिलेल्या रिक्त जागांचा तपशील व महाविद्यालयांचे कटआॅफ वेळापत्रकानुसार बुधवारी जाहीर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते जाहीरच करण्यात आले नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे कटआॅफ उपलब्ध न झाल्याने गुरुवारी पसंतीक्रम भरण्यासाठी त्यांना अडचणीचा सामना करावा लागला.