शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मेळघाटातला २७ वर्षांचा तरुण संतोष काश्मिरात कलेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रातल्या मेळघाटमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा मुलगा जिद्दीने जिल्हाधिकारी झाला आणि आता त्याचे पोस्टिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रातल्या मेळघाटमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा मुलगा जिद्दीने जिल्हाधिकारी झाला आणि आता त्याचे पोस्टिंग थेट जम्मू-काश्मीरमधल्या कारगिलमध्ये झाले आहे. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी संतोष सुखदेवे हे कारगिलचे जिल्हाधिकारी बनले आहेत.

कारगिलच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संतोष यांना कारगिल माहीत होते ते फक्त बातम्यांमधूनच. कारगिलचे युद्ध झाले तेव्हा संतोष अवघ्या सहा वर्षांचा होता. मेळघाटातल्या धारणीजवळच्या नारवटी या जेमतेम सहाशे-सातशे लोकवस्तीच्या गावात राहणारा. हातातोंडाशी गाठ असलेलं त्याचं कुटुंब. गावातले लोक छोट्या-छोट्या कामांसाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे घालताना संतोष लहानपणापासूनच पाहात आला होता. पण त्याच सरकारी पदावर जाऊ, असा विचार त्याने बारावी होईपर्यंतही केला नव्हता.

पहिली ते चौथीपर्यंत संतोष जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात हुशार असल्याने पुढच्या शिक्षणासाठी तो जवळच्या गावात गेला. त्याची हुशारी पाहून शाळेतल्या एका शिक्षकांनी त्याला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायला सांगितले. अमरावतीच्या नवोदय विद्यालयात संतोषने प्रवेश घेतला आणि हाच त्याच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.

बारावीपर्यंत ‘नवोदय’मध्ये शिकल्यानंतर संतोषने गुणवत्तेच्या आधारावर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) प्रवेश मिळवला. पुण्यात राहायचे कोठे हा प्रश्न होता. गोखलेनगरच्या विद्यार्थी सहायक समितीने हा प्रश्न सोडवला. शिष्यवृत्ती आणि ‘कमवा शिका’मधून शिक्षणाचा खर्च भागवायला त्याने सुरुवात केली.

संतोष सुखदेवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांना मदत करायचो आणि ते मला आवडत होतं त्याचं समाधान मिळत होतं. गावी लोकांचे होणारे हाल मी पाहिले होते. त्यातून ठरवलं की ज्यातून बदल घडवता येईल असं काही आपण करू. दोन पर्याय होते. ‘एनजीओ’त काम करणे आणि दुसरा म्हणजे सरकारी नोकरी. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला.”

इंजिनिअरिंगच्या शेवटचा वर्षाला असताना संतोष यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. जवळपास दीड वर्ष तयारी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले. निकाल लागल्यावर त्यांनी आई-वडिलांना निकाल कळवला तेव्हा आई म्हणाली, “चांगलं झालं तुला सरकारी नोकरी लागली.” मुलगा आयएएस झाला म्हणजे काय हेही त्या माऊलीला माहिती नव्हते. प्रशिक्षणानंतर त्यांना जम्मू काश्मीर केडर मिळाले.

आधी ‘एसडीएम’ म्हणून काम केल्यावर संतोष यांना जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाले तेही थेट कारगिलचे. संतोष सांगतात, “ज्या खुर्चीवर बसायचे स्वप्नं होते ते पूर्ण झाले. पण हे स्वप्न आव्हानेही घेऊन आले आहे. कारगिल विकासाच्या बाबतीत अगदी मागे आहे. शिक्षणाचे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे येथे बेरोजगारी खूप आहे. पर्यटक येतात तेही धावती भेट द्यायला. यामुळे कामाला खूप वाव आहे. मेळघाटच्या अडचणी अनुभवल्या असल्याने जमिनीशी नाळ जोडलेली आहे. येथून पुढेही तेच करायचं आहे.”