शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

घरपट्टीतही 25 टक्के वाढ

By admin | Updated: November 27, 2014 23:07 IST

शहरातील पाणीपट्टीत सुमारे 25 टक्के वाढ केली. त्याला चार महिने होत नाहीत, तोच नगरपालिकेने घरपट्टीतही 25 टक्के वाढ केल्याने शहरातील घरमालकांवर पुन्हा एकदा बोजा पडणार आहे.

भोर : शहरातील पाणीपट्टीत सुमारे 25 टक्के वाढ केली.  त्याला चार महिने होत नाहीत, तोच नगरपालिकेने घरपट्टीतही 25 टक्के वाढ केल्याने शहरातील घरमालकांवर पुन्हा एकदा बोजा पडणार आहे. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे. सुविधांचा आभाव; मात्र करात वाढ. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
  भोर नगरपालिकेने 2क्14-15 ते 2क्17-18 या कालावधीसाठी तयार केलेल्या कर आकारणीत सरासरी 25 ते 3क् टक्के घरपट्टीवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे . नगरपालिकेने सर्व मिळकतधारकांना प्रस्तावित करआकारणी देयकाच्या नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली असून, त्या विरोधात एक महिन्याच्या आत नगरपालिकेकडे हरकती, सूचना लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. 
विहित मुदतीत मिळकतधारकांच्या हरकती, सूचना प्राप्त झाल्या नाहीत, तर सध्या आकारण्यात आलेली आकारणी (घरपट्टी) कायम करण्यात येणार आहे.
प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकारी नगर रचना (पुणो) यांनी ही कर रचना केली आहे. 1995-96 च्या चतुर्थ वार्षिक करआकारणी वेळी शहराचे चार विभाग करण्यात आले होते. तेच कायम ठेवण्यात आले आहेत. नगरपालिकेला दर वर्षी सुमारे 4क् लाख रुपये कर मागणी आहे. या नवीन कर आकारणीमुळे ती एक कोटीच्या पुढे जाणार आहे, अशी अपेक्षा नगरपालिकेकडून व्यक्त केली जात आहे.
नगरपालिकेकडून लाखो रुपयांचा शिक्षण कर, वृक्षकर वसूल केला जातो आणि यातून शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणी, वीज यासाठी खर्च करायचा आहे. मात्र, यापैकी पाणी वगळता कोणत्याच सुविधा नियमित मिळत नाहीत. स्वच्छतेचा व आरोग्याचा तर बोजवारा उडाल्याचे शहरातील नागरिक सांगतात. 
 
घरपट्टी 5क्,58,535 रु., पाणीपट्टी 48,39,541 रु., शिक्षण कर 21,22,7क्5  रु., रोजगार हमी कर 3,73,434 रु., तर वृक्षकर 38,793 रु. असे एकूण एक कोटी चोवीस लाख रुपयांची (1,24,33,क्क्8) थकबाकी आहे. यात धनदांडग्या लोकांचा समावेश असून, वर्षानुवर्ष वसुली होत नसल्याचे नगरपालिकेच्या अधिका:यांनी सांगितले.
 
सुमारे 5क् वर्षापूवी बांधलेली जुनी घरे आहेत. त्यांना सदरची घरपट्टी स्क्वेअर फुटांवर मोजून लावल्याने घरपट्टीत 2क् पट वाढ झाली आहे. हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे जुन्या घरांना यातून वगळावे, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश किरवे यांनी केली आहे. तर, विभागानुसार असणारी घरपट्टी अन्यायकारक असल्याचे काही नागरिकांचे म्हणणो आहे.