शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

घरपट्टीतही 25 टक्के वाढ

By admin | Updated: November 27, 2014 23:07 IST

शहरातील पाणीपट्टीत सुमारे 25 टक्के वाढ केली. त्याला चार महिने होत नाहीत, तोच नगरपालिकेने घरपट्टीतही 25 टक्के वाढ केल्याने शहरातील घरमालकांवर पुन्हा एकदा बोजा पडणार आहे.

भोर : शहरातील पाणीपट्टीत सुमारे 25 टक्के वाढ केली.  त्याला चार महिने होत नाहीत, तोच नगरपालिकेने घरपट्टीतही 25 टक्के वाढ केल्याने शहरातील घरमालकांवर पुन्हा एकदा बोजा पडणार आहे. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे. सुविधांचा आभाव; मात्र करात वाढ. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
  भोर नगरपालिकेने 2क्14-15 ते 2क्17-18 या कालावधीसाठी तयार केलेल्या कर आकारणीत सरासरी 25 ते 3क् टक्के घरपट्टीवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे . नगरपालिकेने सर्व मिळकतधारकांना प्रस्तावित करआकारणी देयकाच्या नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली असून, त्या विरोधात एक महिन्याच्या आत नगरपालिकेकडे हरकती, सूचना लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. 
विहित मुदतीत मिळकतधारकांच्या हरकती, सूचना प्राप्त झाल्या नाहीत, तर सध्या आकारण्यात आलेली आकारणी (घरपट्टी) कायम करण्यात येणार आहे.
प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकारी नगर रचना (पुणो) यांनी ही कर रचना केली आहे. 1995-96 च्या चतुर्थ वार्षिक करआकारणी वेळी शहराचे चार विभाग करण्यात आले होते. तेच कायम ठेवण्यात आले आहेत. नगरपालिकेला दर वर्षी सुमारे 4क् लाख रुपये कर मागणी आहे. या नवीन कर आकारणीमुळे ती एक कोटीच्या पुढे जाणार आहे, अशी अपेक्षा नगरपालिकेकडून व्यक्त केली जात आहे.
नगरपालिकेकडून लाखो रुपयांचा शिक्षण कर, वृक्षकर वसूल केला जातो आणि यातून शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणी, वीज यासाठी खर्च करायचा आहे. मात्र, यापैकी पाणी वगळता कोणत्याच सुविधा नियमित मिळत नाहीत. स्वच्छतेचा व आरोग्याचा तर बोजवारा उडाल्याचे शहरातील नागरिक सांगतात. 
 
घरपट्टी 5क्,58,535 रु., पाणीपट्टी 48,39,541 रु., शिक्षण कर 21,22,7क्5  रु., रोजगार हमी कर 3,73,434 रु., तर वृक्षकर 38,793 रु. असे एकूण एक कोटी चोवीस लाख रुपयांची (1,24,33,क्क्8) थकबाकी आहे. यात धनदांडग्या लोकांचा समावेश असून, वर्षानुवर्ष वसुली होत नसल्याचे नगरपालिकेच्या अधिका:यांनी सांगितले.
 
सुमारे 5क् वर्षापूवी बांधलेली जुनी घरे आहेत. त्यांना सदरची घरपट्टी स्क्वेअर फुटांवर मोजून लावल्याने घरपट्टीत 2क् पट वाढ झाली आहे. हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे जुन्या घरांना यातून वगळावे, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश किरवे यांनी केली आहे. तर, विभागानुसार असणारी घरपट्टी अन्यायकारक असल्याचे काही नागरिकांचे म्हणणो आहे.