शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

२३३ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त!

By admin | Updated: October 3, 2015 01:38 IST

जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून

पुणे : जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून, उघड्यावर न बसण्याची शपथ घेतली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. पुणे जिल्हाही यात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी प्रशासनाला मुळशी तालुका हगणदारीमुक्त करण्यात यश आले आहे. यंदा भोर व वेल्हे तालुक्यात १00टक्के शौचालये बांधण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शासनाने यंदा या अभियानांतर्गत सुरुवातीला दिलेले ५५ हजार २८७ शौचालयांचे उद्दिष्ट निम्मे केले आहे. असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासन रोटरीच्या साह्याने जिल्ह्यात जास्तीत जास्त कुटुंबांना शौचालये बांधून देण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेत झालेल्या दक्षता समितीच्या बैैठकीत याचा आढावा घेण्यात आला. या वेळी पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी राहुल साकोरे यांनी जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील हगणदारीमुक्त ग्रामपंचायतीत २ आॅक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभांत गाव हगणदारीमुक्त झाल्याचे ठराव घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज या २३३ गावांत ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यात आले. हगणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींत मुळशी तालुक्याने ९५ पैकी ९५ ग्रामपंचायतींत (१00 टक्के) शौचालये बांधून पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच जिल्ह्यातील तालुका हगणदारीमुक्त करण्यातही त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर भोर तालुक्यात १५५ ग्रामपंचायतींपैकी २८, वेल्हे तालुक्यात ७0 पैकी २६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त होऊन आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात सर्वांत मागे इंदापूर तालुका असून, तेथील ११३ पैकी फक्त २ ग्रामपंचायतींना १00 टक्के शौचालये बांधली आहेत. त्यानंतर दौंडमधील ७९ पैकी एकच ग्रामपंचायत आहे. (प्रतिनिधी)