शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी 21771उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या सर्वच तालुक्यात उमेदवारांनी मोठी गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या सर्वच तालुक्यात उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. त्यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा सर्व्हर काही काळ बंद पडल्याने या गोंधळात अधिकच भर पडली. अखेर जिल्ह्यातील 6 हजार 980 जागांसाठी 21 हजार 771 उमेदवारांनी अर्ज दाखल केला.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ, नेटवर्कची समस्या आणि इंटरनेटचे स्पीड यामुळे अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफ लाईन देखील अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (दि.30) अखेरची मुदत होती. परंतु ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करताना चांगलीच तारांबळ उडाली . त्यात अर्ज दाखल शेवटचा दिवस असल्याने एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने कोरोनाच्या सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा पुरता फज्जा उडाला.

------

जिल्ह्यात निवडणुका होणा-या ग्रामपंचायती : 746

- एकूण सदस्य संख्या : 6980

- एकूण प्रभागांची संख्या : 2691

- एकूण मतदान केंद्रे : 3008

------

- पुरूष मतदार : 8 लाख 59 हजार 996

- स्त्री मतदार : 7 लाख 86 हजार 559

- यावेळी पहिल्यांदा मतदान : 1 लाख 65 हजार

------

जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या व दाखल झालेले अर्ज

खेड -91( 2028) भोर-73( 1264) शिरूर-71(2585), जुन्नर-66(1691) पुरंदर-68(1662), इंदापूर-60(2291), मावळ - 57(1596), हवेली- 54(1802), बारामती- 52(2255), दौंड - 51(2272), मुळशी - 45(1149), वेल्हा - 31(430), आंबेगाव- 29(746) एकूण : 746

---------

किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार 4 जानेवारीला कळणार

पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 21771उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची गुरुवार (दि.31) डिसेंबर रोजी छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी आहे. यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार हे 4 जानेवारीला निश्चित होईल. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सध्या अनेक प्रकारच्या बोली लावल्या जात आहेत.