शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी 21771उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या सर्वच तालुक्यात उमेदवारांनी मोठी गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या सर्वच तालुक्यात उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. त्यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा सर्व्हर काही काळ बंद पडल्याने या गोंधळात अधिकच भर पडली. अखेर जिल्ह्यातील 6 हजार 980 जागांसाठी 21 हजार 771 उमेदवारांनी अर्ज दाखल केला.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ, नेटवर्कची समस्या आणि इंटरनेटचे स्पीड यामुळे अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफ लाईन देखील अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (दि.30) अखेरची मुदत होती. परंतु ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करताना चांगलीच तारांबळ उडाली . त्यात अर्ज दाखल शेवटचा दिवस असल्याने एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने कोरोनाच्या सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा पुरता फज्जा उडाला.

------

जिल्ह्यात निवडणुका होणा-या ग्रामपंचायती : 746

- एकूण सदस्य संख्या : 6980

- एकूण प्रभागांची संख्या : 2691

- एकूण मतदान केंद्रे : 3008

------

- पुरूष मतदार : 8 लाख 59 हजार 996

- स्त्री मतदार : 7 लाख 86 हजार 559

- यावेळी पहिल्यांदा मतदान : 1 लाख 65 हजार

------

जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या व दाखल झालेले अर्ज

खेड -91( 2028) भोर-73( 1264) शिरूर-71(2585), जुन्नर-66(1691) पुरंदर-68(1662), इंदापूर-60(2291), मावळ - 57(1596), हवेली- 54(1802), बारामती- 52(2255), दौंड - 51(2272), मुळशी - 45(1149), वेल्हा - 31(430), आंबेगाव- 29(746) एकूण : 746

---------

किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार 4 जानेवारीला कळणार

पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 21771उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची गुरुवार (दि.31) डिसेंबर रोजी छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी आहे. यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार हे 4 जानेवारीला निश्चित होईल. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सध्या अनेक प्रकारच्या बोली लावल्या जात आहेत.