शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

चासकमान धरणसाठ्यात २० टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: July 4, 2017 03:29 IST

खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात २० टक्क्याने वाढ झाली आहे. खेड तालुक्याच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांवर विशेषत: भीमाशंकर अभयारण्य परिसरात मागील आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. चासकमान धरणाच्या जलाशयात उन्हाळ्याच्या अखेरीस ५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तसेच पाणीपातळी ६३०.५३ होती तर एकूण साठा ३९.१० दलघमी होता. उपयुक्त पाणीसाठा ११.९१ दलघमी होता. परंतु सध्या भीमाशंकर, खरोशी, मंदोशी, शिरगाव, भोरगिरी, धामणगाव, आव्हाट, वाळद, डेहेणे, वाडा, सह धरण परिसरात पावसाच्या दमदार हजेरीमुळे धरण परिसरात २६९ मिली मीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्याात तब्बल २० टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या पाणीपातळी ६३७.२६ आहे. एकूण साठा ८२.७६ दलघमी तर उपयुक्त साठा ५५.५७ दलघमी तसेच पाणी टक्केवारी २५.९० टक्के इतकी आहे. चासकमान धरण परिसरात पाऊस असाच सुरू राहिल्यास खेडसह शिरूर तालुक्याची पाणी समस्या दूर होणार आहे. या परिसरात आणखी दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी निश्चित वाढेल.