शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २ लाख ५६ हजार विडी कामगार दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

पुणे : राज्य शासनाने २०१४ मध्ये विडी कामगारांसाठी किमान वेतन कायदा मंजूर केला. मात्र, त्याची अंमलबजावणीच करण्यात न आल्याने ...

पुणे : राज्य शासनाने २०१४ मध्ये विडी कामगारांसाठी किमान वेतन कायदा मंजूर केला. मात्र, त्याची अंमलबजावणीच करण्यात न आल्याने राज्यातील २ लाख ५६ हजार विडी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच, कोरोनामुळे दोन महिन्यांपासून विडी कारखाने बंद असल्यामुळे विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे किमान वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी विडी कामगार करत आहेत.

राज्यातील विडी कामगारांना दर हजार विडीमागे किमान २१० रुपये मिळावेत, यासाठी २०१४ मध्ये कायदा करण्यात आला होता. मात्र, आज २०२१ मध्येही हा किमान वेतन कायदा लागू करण्यात आला नाही. सध्या विडी कामगारांना एक हजार विडी वळल्यास १८५ रुपये मिळतात. प्रत्येकालाच एक हजार विडी वळणे शक्य नसल्याने दररोज एका कामगाराला सरासरी १५० रुपये कामगारांना मिळतात.

पुण्यात सात विडी कारखाने असून त्यात चार मोठे आणि तीन लहान कारखाने आहेत. पुणे जिल्ह्यात ३३०० नोंदणीकृत कामगार असून २००० अनोंदणीकृत कामगार आहेत. विडी कामगारांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. अखिल भारतीय विडी मजदूर महासंघाचे सचिव उमेश विश्वाद म्हणाले की, विडी वळण्याचे काम घरी बसून केले जात असल्यामुळे यात महिलांची संख्या अधिक आहे. या महिला विडी वळण्यासाठी आवश्यक तेंदूचे पान, तंबाखू आणि दोरा हा कच्चा माल कारखान्यांमधून घेतात आणि घरी विडी वळतात. मात्र, लॉकडाऊनमुळे कामगारांना हा कच्चा माल आणण्यावरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे विडी कामगारांना आर्थिक मदत द्या अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. मात्र, सरकार किंवा प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. किमान वेतन कायदा अस्तित्वात आल्यानंतर किमान वेतन अधिसूचना मागे घ्यावी, या मागणीसाठी कारखानदारांनी समिती स्थापन केली होती. कायदा मागे घेण्यात आला नाही. मात्र, तो लागूही करण्यात आला नाही.

पुण्यातील कारखाने आजपासून सुरू

पुण्यातील विडी कारखाने मंगळवार (८ जून) पासून सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे विडी कामगारांचा उपजीविकेचा प्रश्न सुटणार आहे.

उद्योगाच्या समस्या

विडी उद्योगासाठी कच्च्या मालाचा दर्जा चांगला नसणे ही सध्याची मोठी समस्या आहे. पूर्वी कारखान्यांचे मालक स्वत: जाऊन तेंदूच्या पानांची पाहणी करायचे. तसेच, झाडांची निगाही राखली जात होती. मात्र, सध्या पाने तोडण्याचे कामही कंत्राटी पद्धतीने केले जाते. त्यामुळे झाडांची निगा राखली जात नाही. कंपन्यांचे अधिकारी तेंदूची खराब पाने बाजूला करतात. त्यामुळे पाने तोडणाऱ्यांची मजुरी कमी होते. छाट विडी ही देखील या उद्योगाची समस्या आहे. छाट विडी म्हणजे विडी वळणाऱ्या कामगारांना एक हजार विड्यांमागे पाच विडी अधिकच्या वळून द्याव्या लागतात.

वेलफेअर बोर्ड नावापुरते

हा कुटीर उद्योग आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सरकार आवश्यक तेवढे लक्ष देत नाही. त्यांच्यासाठीचा कायदा केवळ कागदावरच आहे. वेलफेअर बोर्डाकडून कोणतीही सुविधा मिळत नाही. २०१७ पासून वेलफेअर बोर्डाला पैसे मिळत नाहीत. त्यामुळे विडी कामगारांना आम्ही शिक्षण, आरोग्य सुविधा कशा देणार? असा सवाल वेलफेअर बोर्ड करत आहे. विडी कामगारांसाठी असलेल्या लहान-लहान रुग्णालयांमध्ये कर्मचारी आहेत.

त्यांना दरमहा वेतन दिले जाते. मग विडी कामगारांना सुविधा का दिल्या जात नाहीत, असा प्रश्न कामगार करत आहेत.

विडी उद्योग असणारी राज्ये

प. बंगाल, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, केरळ, त्रिपुरा, महाराष्ट्र यांसह १७ राज्यांमध्ये विडी उद्योग केला जातो. पश्चिम बंगालमध्ये या उद्योगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पुण्यातील विडी कामगार - ५३००

नोंदणीकृत - ३३००

अनोंदणीकृत - २०००

विडी कामगारांचे वेतन - १८५ (एक हजार विडीमागे)

प्रलंबित सुधारित वेतन - २१० (एक हजार विडीमागे)

फोटो- विडी कामगार