शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

मेळाव्यात १८१ जणांना ‘आॅन द स्पॉट’ नोकरी

By admin | Updated: December 17, 2015 02:08 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा

पुणे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले असून, गरीब कुटुंबातील आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘एक कुटुंब एक नोकरी’ देण्याचे शासनाचे धोरण आहे. यानुसार राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेत हा मेळावा आयोजिला होता. यासाठी ३५१ उमदेवार सहभागी झाले होते. यातील १८१ जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपायुक्त आर. पी. झेंडे, प्रकल्प संचालक डी. डी. डोके उपस्थित होते. मुलाखतीसाठी एमपीटीए एज्युकेशन, टाटा वेस्टसाईड, जीफोर सिक्युरिटी सर्व्हिस या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ग्रामीण भागासह शहर परिसरात त्यांच्या शाखा आहेत. नियुक्तीची पत्रे दिलेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग घेतले जाणार असून त्यांची कलचाचणीही घेतली जाणार आहे. ८ हजार ९०० पासून १२ हजारापर्यंत वेतन देण्यात येणार आहे. जीफोर सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये ५६ जणांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली आहे. एमपीटीए एज्युकेशन संस्थेत ‘कमवा व शिका’ हा उपक्रम असून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पुढील चार वर्षांत तेथे शिक्षणाबरोबर रोजगाराचीही संधी मिळणार आहे. मेळाव्याचा समारोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी कंद यांनी भविष्यात रोजगार मेळाव्याची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराची सधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यापुढे तालुकानिहाय असे मेळावे जिल्हा परिषदेतच आयोजित करून तालुक्यानुसार बेरोजगारी कमी करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या वेळी दहावी व बारावी पास झालेले उमेदवार सहभागी झाले होते. यापुढे उच्च शिक्षण घेतलेल्यांसाठीही कंपन्यांतील मागणीनुसार हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रकल्प संचालक डोके यांनी सांगितले. उमेदवारांना या मेळाव्यात घेऊन येण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी महत्त्वाचे काम केले. (प्रतिनिधी)