शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मेळाव्यात १८१ जणांना ‘आॅन द स्पॉट’ नोकरी

By admin | Updated: December 17, 2015 02:08 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा

पुणे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले असून, गरीब कुटुंबातील आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘एक कुटुंब एक नोकरी’ देण्याचे शासनाचे धोरण आहे. यानुसार राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेत हा मेळावा आयोजिला होता. यासाठी ३५१ उमदेवार सहभागी झाले होते. यातील १८१ जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपायुक्त आर. पी. झेंडे, प्रकल्प संचालक डी. डी. डोके उपस्थित होते. मुलाखतीसाठी एमपीटीए एज्युकेशन, टाटा वेस्टसाईड, जीफोर सिक्युरिटी सर्व्हिस या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ग्रामीण भागासह शहर परिसरात त्यांच्या शाखा आहेत. नियुक्तीची पत्रे दिलेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग घेतले जाणार असून त्यांची कलचाचणीही घेतली जाणार आहे. ८ हजार ९०० पासून १२ हजारापर्यंत वेतन देण्यात येणार आहे. जीफोर सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये ५६ जणांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली आहे. एमपीटीए एज्युकेशन संस्थेत ‘कमवा व शिका’ हा उपक्रम असून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पुढील चार वर्षांत तेथे शिक्षणाबरोबर रोजगाराचीही संधी मिळणार आहे. मेळाव्याचा समारोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी कंद यांनी भविष्यात रोजगार मेळाव्याची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराची सधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यापुढे तालुकानिहाय असे मेळावे जिल्हा परिषदेतच आयोजित करून तालुक्यानुसार बेरोजगारी कमी करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या वेळी दहावी व बारावी पास झालेले उमेदवार सहभागी झाले होते. यापुढे उच्च शिक्षण घेतलेल्यांसाठीही कंपन्यांतील मागणीनुसार हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रकल्प संचालक डोके यांनी सांगितले. उमेदवारांना या मेळाव्यात घेऊन येण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी महत्त्वाचे काम केले. (प्रतिनिधी)