शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मेळाव्यात १८१ जणांना ‘आॅन द स्पॉट’ नोकरी

By admin | Updated: December 17, 2015 02:08 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा

पुणे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले असून, गरीब कुटुंबातील आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘एक कुटुंब एक नोकरी’ देण्याचे शासनाचे धोरण आहे. यानुसार राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेत हा मेळावा आयोजिला होता. यासाठी ३५१ उमदेवार सहभागी झाले होते. यातील १८१ जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपायुक्त आर. पी. झेंडे, प्रकल्प संचालक डी. डी. डोके उपस्थित होते. मुलाखतीसाठी एमपीटीए एज्युकेशन, टाटा वेस्टसाईड, जीफोर सिक्युरिटी सर्व्हिस या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ग्रामीण भागासह शहर परिसरात त्यांच्या शाखा आहेत. नियुक्तीची पत्रे दिलेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग घेतले जाणार असून त्यांची कलचाचणीही घेतली जाणार आहे. ८ हजार ९०० पासून १२ हजारापर्यंत वेतन देण्यात येणार आहे. जीफोर सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये ५६ जणांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली आहे. एमपीटीए एज्युकेशन संस्थेत ‘कमवा व शिका’ हा उपक्रम असून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पुढील चार वर्षांत तेथे शिक्षणाबरोबर रोजगाराचीही संधी मिळणार आहे. मेळाव्याचा समारोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी कंद यांनी भविष्यात रोजगार मेळाव्याची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराची सधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यापुढे तालुकानिहाय असे मेळावे जिल्हा परिषदेतच आयोजित करून तालुक्यानुसार बेरोजगारी कमी करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या वेळी दहावी व बारावी पास झालेले उमेदवार सहभागी झाले होते. यापुढे उच्च शिक्षण घेतलेल्यांसाठीही कंपन्यांतील मागणीनुसार हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रकल्प संचालक डोके यांनी सांगितले. उमेदवारांना या मेळाव्यात घेऊन येण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी महत्त्वाचे काम केले. (प्रतिनिधी)